PM Modi : लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा समोर आला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भाजपच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आजचा दिवस शुभ आहे. देशातील अनेक राज्यात नवीन वर्षाचा आनंद आहे. केरळ, तामिळनाडू, ओडिसा, बंगालमध्ये शुभ दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची पूजा करतो. आई कात्यायनीच्या दोन्ही हाती कमळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या शुभ दिनी भाजपचं संकल्पपत्र समोर ठेवलं आहे.
देशातील अनेक सक्रिय नागरिकांनी हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी सूचना पाठवल्या होत्या. विकसित भारताच्या ४ स्तंभावर हे संकलपत्र फोकस करत आहे. भाजपच्या संकल्पपत्रात युवा भारताच्या युवा संकल्पाची युवा आकांशा आहे. भाजपने दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण केलेली आहेत. सबका साथ सबका विकास हेच भाजप ध्येय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तृतीयपंथीयांना प्रतिष्ठा देण्याचा निर्णय घेतला. त्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. १ कोटी लखपती दीदी बनल्या आहेत.आता ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी दिली आहे. गावच्या मुलींना पायलट बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
|
मोफत राशनची योजना पुढचे ५ वर्ष सुरू असेल. गरिबाच्या जेवणाच ताट त्याच्या मनाला समाधान देणार असेल, ही मोदींची गॅरंटी आहे. आयुष्मान भारतमध्ये मोफत उपचार मिळत राहतील. भाजपने संकल्प केला आहे, ७० वर्षाच्या पुढील व्यक्तीला आयुष्मान योजनेत आणल जाणार आहे. त्याला ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. महिला खेळाडूंना पुढे जाण्यासाठी विशेष सुविधा बनवल्या जाणार आहे. कॅन्सरमुक्तीसाठी योजना चालवणार आहे. ग्रामीण भागातील सगळ्यांना सशक्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पीएम किसान योजनेचा फायदा पुढे सुरू राहील. देशातील सहकारी संस्थांची संख्या वाढवली आहे. आत्मनिर्भरतेसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक प्रकारची मदत करेल. शेतकऱ्यांना मोतीच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. भाजपचा संकल्प भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणारा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हटले आहेत.
परिवार वाढत असल्याने आणखी ३ कोटी घर बांधण्याचा संकल्प करत आहोत. पाईपने प्रत्येक घरी गॅस पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मुद्रा योजनेतील निधीची मर्यादा २० लाख करण्यात येणार आहे. मोदींनी प्रधानमंत्री अवास योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला, (Politics) किसान योजनेचं योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला आणि छत्तीसगडच्या बस्तरमधून आलेल्या महिलेला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना संकल्प पत्र दिलं आहे. पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे.
पुढच्या वर्षी बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार. सर्वांत जुनी भाषा तमिळ भाषा देशाची गौरव भाषा आहे. भाजप इको टुरिझमचे सेंटर बनवणार आहे. अनेक लहान लहान अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही योजना तयार केल्या आहेत. 6G वर काम सुरू आहे. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन मिळतील यासाठी प्रयत्न करत आहोत. सोशल, फिजिकल, डिजिटलचा विस्तार करणार आहे.
अजेंडा तयार करण्यासाठी भाजपने नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने अनेक बैठका घेऊन जाहीरनामा अंतिम केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू आणि अर्जुनराम मेघवाल यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि माजी केंद्रीय मंत्री रवींद्रभाई पटेल यांच्यासह एकूण २७ नेते सहभागी झाले होते. शंकर प्रसाद हे या समितीचे सदस्य आहेत.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर