Water Tanker Service in Mumbai : धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आधीच मुंबईतील पाणीपुरवठा कमी झाला असून आता त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० एप्रिलपासून मुंबईथील वॉटर टँकर सेवा बंद होणार आहे. मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाबाबत नवे नियम लागू केल्याने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक विहीर आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आल्याने पाणीपुरवठा कसा करायचा? या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने या निर्णयाविरोधात वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील विविध भागात आधीच पाणी पुरवठा सुरळीत नसताना वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचं म्हणणं काय?
याबाबत मुंबई टँकर असोसिएशनचे अंकूर वर्मा म्हणाले, “मुंबई वॉटर टँकर असोसिएशन १० एप्रिलपासून व्यवसाय बंद करणार आहे. कारण आम्हाला सेंट्रल लॉन वॉटर अथॉरिटीबाबत मुंबई महापालिकेकडून नोटीस आली आहे. ३८१ ए ची नोटीस आली आहे. तुम्ही तुमची बोअरवेल काढून पाईप डिसमेंट करावी, अशी ही नोटीस आहे. ७० ते ८० वर्षांपूर्वीचा हा व्यवसाय आहे. जर टँकरच नसतील पाण्याची वाहतूक कशी होणार?” ते एपीबी माझाशी बोलत होते.
Ratnagiri : रत्नागिरीत ७७ हजार ५०० रुपयाचा ब्राऊन हिरोईन सदृश पदार्थासह एकाला पकडले |
दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तर काही सोसायट्यांना टँकरमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. कुलाबा, घाटकोपर, मुलुंड, वरळी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, कुर्ला, विद्याविहार, येथे तीव्र पाणीटंचाई असून या भागात मोठ्या प्रमाणात वॉटर टँकर्स मागवले जातात. तसंच, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बोअरवेलचे पाणी पुरवण्यात येत असल्याने नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं आहे.
मुंबईत पाणीबाणीचं संकट?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणांतील पाणीसाठा ३३.५७ टक्क्यांवर आला आहे. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलैअखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला या राखीव साठ्याचा वापर करावा लागणार आहे.
शहर
- Pune Crime : पुण्यात ताडी पिऊन तरुणाचा मृत्यू; महिलांचा रुद्रावतार, बाटल्यांसह अवैध दारु विक्रेत्यांचे दुकानं फोडली
- Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा
- Pune : ‘प्रधानमंत्री आवास’मध्ये किवळेत सदनिका, संमतीपत्र, कागदपत्रे सादर करण्याचे महापालिकेचे आवाहन
- Pune : पुण्यात रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा; जीवाणूसह विषाणू चाचणी सुविधा
महाराष्ट्र
- Kolhapur : धनगराच्या पालावर क्रांतीची नवी पहाट, मेंढ्या चारत चारत अभ्यास केला; कागलचा बिरोबा IPS झाला
- Dombivli : तीन मावस भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आज डोंबिवली बंद
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
गुन्हा
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam Terror Attack : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर,
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त
- INS Surat : पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणीची तयारी, त्याआधीच भारताने आएनएस सूरत समुद्रात उतरवले
- Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..