Marathwada Water Issue : पुढील दोन दिवसांत नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, अशी मागणी करत नांदूर मध्यमेश्वर धरणाजवळ आंदोलन करण्यात आले आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्याचबरोबर जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
दरवर्षीं नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक पाणी सोडण्यात येते. हे पाणी आरक्षित करण्यात येत असून मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून आज किंवा उद्या हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमधील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, या मागणीसाठी अमृता पवार यांच्या नेतत्वाखालील आंदोलन केले आहे.
|
यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे, निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणामार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे आता शासन याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात यावे यासाठी काही संघटनांनी आंदोलन देखील केल्याचे समोर येत आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मागणी लावून धरल्याने पाणी आवर्तनावर काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे.
विविध धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव....
प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे, यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून पाणी सोडल्यावर हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत अंदाजे 30 टक्के पाण्याचा नुकसान होते. त्यामुळे, जायकवाडी धरणात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, आणि यासाठी साडेबारा टीएमसी पाणी वरील विविध धरणातून सोडण्याचा प्रस्तावछत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला आहे. मात्र, जायकवाडीत साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, यासाठी 11 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बैठकीत 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण