Marathwada Water Issue : पुढील दोन दिवसांत नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, अशी मागणी करत नांदूर मध्यमेश्वर धरणाजवळ आंदोलन करण्यात आले आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्याचबरोबर जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
दरवर्षीं नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक पाणी सोडण्यात येते. हे पाणी आरक्षित करण्यात येत असून मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून आज किंवा उद्या हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमधील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, या मागणीसाठी अमृता पवार यांच्या नेतत्वाखालील आंदोलन केले आहे.
|
यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे, निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणामार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे आता शासन याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात यावे यासाठी काही संघटनांनी आंदोलन देखील केल्याचे समोर येत आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मागणी लावून धरल्याने पाणी आवर्तनावर काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे.
विविध धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव....
प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे, यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून पाणी सोडल्यावर हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत अंदाजे 30 टक्के पाण्याचा नुकसान होते. त्यामुळे, जायकवाडी धरणात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, आणि यासाठी साडेबारा टीएमसी पाणी वरील विविध धरणातून सोडण्याचा प्रस्तावछत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला आहे. मात्र, जायकवाडीत साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, यासाठी 11 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बैठकीत 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहर
- Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, आर्थिक तणाव अन् वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या, पोलिसांचा रिपोर्टमधून दावा
- Pimpri-Chinchwad News : मुळा नदीत जेसीबीद्वारे हजारो ब्रास वाळूची तस्करी, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
- Ratnagiri : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश
- Ratnagiri : वरवडे येथे एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारीस मदत करणाऱ्या नौकेवर कारवाई
महाराष्ट्र
- Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण, आर्थिक तणाव अन् वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या, पोलिसांचा रिपोर्टमधून दावा
- Ratnagiri : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश
- Thane : ठाण्यातील कलेक्टरच्या पीए पल्लवी सरोदे यांचा मृत्यू
- Leopard Attack : जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी अंगणात गेली; चिमुकलीवर बिबट्याची झडप, रात्रीची थरारक घटना
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं