नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आता नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. काल म्हणजे रविवारी १० जूलैला आयएनएस विक्रांतची चौथी आणि अखेरची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भर समुद्रात विविध उपकरणांच्या चाचण्या झाल्यावर विक्रांत काल कोच्ची बंदरातल्या कोच्ची शिपयार्डच्या तळावर परतली.
जुलै महिन्याच्या अखेरीस विक्रांत ही नौदलाकडे सूपुर्त केली जाईल. येत्या १५ ऑगस्टला आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेते दाखल करत ‘आझादी का अमृतमहोत्सव ‘ (Azadi Ka Amrit Mahotsav) कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
नौदलात नाव व्यपगत होत नाही
नौदलात एखादी युद्धनौका-पाणबुडी ही सेवेतून निवृत्त झाली की तेच नाव कालांतराने त्याच प्रकारच्या श्रेणीतील युद्धनौकांना द्यायची प्रथा आहे. म्हणजेच नौदलात युद्धनौकेला दिलेले नाव हे कधीही पुसले जात नाही, नष्ट होत नाही, व्यपगत होत नाही. नव्या युद्धनौकेच्या निमित्ताने विक्रांत हे नाव कायम रहाणार आहे. ब्रिटीशांनी वापरलेल्या विमानवाहू युद्धनौकेची डागडुजी करत भारतीय नौदलाने पहिली विमानवाहू युद्धनौका १९६१ च्या सुमारास सेवेत दाखल करुन घेतली. तिचे नामकरण आयएनएस विक्रांत असे करण्यात आले. ही विक्रांत १९९७ ला सेवेतून निवृत्त झाली. आता हेच नाव स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेला देण्यात आले आहे.
नव्या विक्रांतचा प्रवास
नवी आयएनएस विक्रांतची बांधणी ही स्वबळावर, स्वबळावर आरेखन करत, स्वदेशी तंत्रज्ञान वापरत करण्यात आली आहे. देशाचा विस्तृत समुद्रकिनारा, बदलती सामरिक परिस्थिती लक्षात घेता १९९० च्या दशकात नव्या आणि स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता भासू लागली. त्यानुसार विक्रांतचा आराखडा निश्चित करत कोच्ची शिपयार्डमध्ये फेब्रुवारी २००९ ला विक्रांतच्या बांधणीला सुरुवात झाली. ऑगस्ट २०१३ मध्ये युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवण्यात आली. करोना काळामुळे विक्रांतच्या चाचण्यांना जरा उशीर झाला. असं असलं तरी ऑगस्ट २०२१ ला पहिली, ऑक्टोबर २०२१ला दुसरी, जानेवारी २०२२ ला तिसरी आणि त्यानंतर जूलैच्या पहिल्या आठवड्यात विक्रांतची चौथी चाचणी यशस्वी झाली. या सर्व चाचण्यांमध्ये युद्धनौकेचे मुख्य इंजिन, रडार, संदेशवहन यंत्रणा, विविध अन्य उपकरणे यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तसंच लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर हाताळण्याची युद्धनौकेची क्षमता तपासण्यात आली. आता या सर्व चाचण्या यशस्वी पूर्ण झाल्या असल्याने विक्रांत लवकरच नौदलात दखल होणार आहे.
आयएनएस विक्रांतचे सामर्थ्य
विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे, म्हणजे एकप्रकारे तरंगता विमानतळ हा विक्रांतवर आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हाताळण्याची विक्रांतची क्षमता आहे. विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल १४०० पेक्षा जास्त नौसैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात असतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहे. तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशी या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.
विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजले जाते.विक्रांतची बांधणी हे ६६ टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी आहे. विमनानवाहू युद्धनौक बांधणे हे जगात आत्तापर्यंत फक्त मोजक्या देशांना शक्य झाले आहे. आता यामध्ये भारताचीही भर पडली आहे.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर