
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील पक्षविस्तारासाठी मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी मुंबईतील गटप्रमुखांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी मनसेने हाती घेतलेल्या आंदोलनांवर भाष्य केले. मनसेने हाती घेतलेली आंदोलनं विस्मरणात जाण्यासाठी काय करता येईल त्यासाठी एक यंत्रणा राबवली जाते. याच कारणामुळे आम्ही मनसेने राबवलेल्या आंदोलनांची एक पुस्तिका काढणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. ही पुस्तिका लवकरच मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
“मनसेतर्फे होणारी आंदोलने विस्मरणात कशी जातील, यासाठी काही यंत्रणा काम करत आहेत. जेव्हा मनसेने टोलनाक्याचे आदोलंन केले तेव्हा अनेकांना अटक झाली. मात्र या आंदोलनानंतर ६५ ते ६७ टोलनाके बंद झाले. ज्यांनी टोलनाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांना काहीही विचारले जात नाही. आम्ही आंदोलन यशस्वी केले, मात्र तदीदेखील आम्हाला प्रश्न विचारला जातोय,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
“आपण एक पुस्तिका काढणार आहोत. ही पुस्तिका प्रत्येक मनसे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार आहे. या पुस्तिकेमध्ये गेल्या १६ वर्षांत मनसेने कोणती आंदोलनं केली, मनसेने ती कशी यशस्वी केली, याबाबत माहिती असेल. आपण रेल्वेचं आंदोलन केलं. या रेल्वेच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली गेली. ते आंदोलन उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याविरोधात करण्यात आले, असा रंग देण्यात आला. मात्र या राज्यातून जे लोक आले होते त्यांच्याविरोधातील हे आंदोलन होते,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
“गुजरातमध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने एक आंदोलन केले होते. एका मुलीवर बलात्कार झाल्यामुळे त्याने हे आंदोलन केले होते. या आंदोलनात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या २० हजार लोकांना गुजरातमधून हाकलून देण्यात आले. २०१९ साली त्याच आमदाराला भाजपाने उमेदवारी दिली. माझ्या महाराष्ट्रातील तरूणांसाठी, नोकऱ्यांसाठी आम्ही रेल्वेचे आंदोलन केले होते. ते आंदोलन देश फोडण्यासाठी नव्हते,” असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




