
मुंबई : बारावी परीक्षा गणित विषयात किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी पुढील उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी मिलाप ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. शालेय शिक्षण विभाग व एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीशी करार करण्यात आला असून, या योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, त्याची नोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली.
शिक्षण घेता घेता नोकरी आणि पदवी प्राप्त करून देणारी ही ‘महाराष्ट्र यंग लिडर्स अस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ ( मिलाप) या नावाने ही योजना सुरू करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरिवद सावंत, स्थानिक आमदार राहुल नार्वेकर, शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत एचसीएल व ईएन पॉवर या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले.
विद्यार्थी तंत्रज्ञान, कौशल्य विकास यात कुठेही मागे राहू नयेत, यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजी या जागतिक दर्जाच्या कंपनीमार्फत गणित विषयात ६० टक्के गुणांसह १२ वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा महिन्यांनंतर त्यांना प्रत्यक्ष कंपनीत काम करण्याचीदेखील संधी मिळणार आहे. पहिल्या वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वर्षां गायकवाड यांनी दिली.
या योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एचसीएल कंपनीमार्फत सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीत थेट नोकरी मिळणार आहे. नोकरी करत त्यांना चार वर्षांत अभियांत्रिकी पदवी प्राप्त करता येणार आहे. एकाच वेळी प्रशिक्षण, नोकरी व पदवी प्राप्त करून देणारी ही योजना आहे, असे सर्वशिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. प्रशिक्षण काळात महिना १० हजार रुपये विद्यावेतन व नोकरी सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षांत २ लाख २० हजार रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शहर
- पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
महाराष्ट्र
- पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
गुन्हा
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



