भिगवणमध्ये अपहरण की प्रेमप्रकरण? भिगवण प्रकरणात नवं नाट्य

पुणे जिल्ह्याच्या भिगवण परिसरात एका तरुणीच्या बेपत्ता होण्यावरून सध्या तीव्र चर्चा सुरू आहे. ही घटना अपहरण आहे की प्रेमप्रकरण, याबाबत संभ्रम आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिचे अपहरण करण्यात आले. तिच्या आईला मारहाण करून तिला अशोक लेलँडच्या गाडीतून उचलून नेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याउलट, तरुणीने स्वतः एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे की, ती गेली एक वर्षापासून प्रेमसंबंधात असून, स्वेच्छेने आणि स्वतःच्या मर्जीने प्रियकरासोबत निघून गेली आहे. तिच्यावर कोणतीही जबरदस्ती किंवा अपहरण झालेले नाही, असा तिने खुलासा केला आहे.

या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी लक्ष घातले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी भिगवणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला. पडळकर यांनी तरुणीचा व्हिडिओ जबरदस्तीने बनवण्यात आला असून, तिच्या लग्नाची तयारी सुरू असताना हे कृत्य घडल्याचे म्हटले आहे. तरुणी गायब झाल्यानंतर संतप्त जमावाने पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन केले आणि काही काळ महामार्ग अडवला होता. या घटनेचे गूढ अद्याप कायम आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *