भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदारवल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. समुद्रकिनारी उभे राहूनत्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिलेआणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली.आणि आता 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथअमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापिततेजात सहभाग घेतला. तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्यानेप्रज्वलित झाल्यासारखी वाटते. सोमनाथ मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासूनप्रभास पाटण मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. 3000पासून येथे शेती, पशुपालनाची पूर्व-हडप्पा संस्कृतीअस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथेजीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्त्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेले दगडीनांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. इ.स. 725 मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला. हे पहिले इस्लामी आक्रमण मानले जाते. परंतु सर्वात मोठा आघात 8जानेवारी 1026 रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूदआपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला.पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच श्रद्धाउद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. 1038 मध्ये गोव्याच्या कदंबराजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजाअर्चा,पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचेदिसते. इ.स. 1169 मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवेभव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकालीमंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खाननेमंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणिपदमल यांनी मंदिररक्षणासाठी प्राण दिले. पुढे चुडासमाराजा महिपाल देव यांनी 1308 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणकेले. त्यांचे पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.मग झफर खानने 1395 मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथेजामा मशीद, प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेखआहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आणि नंतरऔरंगजेबाच्या आदेशाने 1665 आणि 1706 मध्ये पुन्हाविध्वंस घडवून आणण्यात आला. परंतु तीर्थक्षेत्र टिकूनराहिले. इ.स. 1782–83 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळनवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर 19 व्या आणि 20 व्याशतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले. स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये जुनागड भारतातविलीन झाले. हिंदू मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यातआली. 12, 13 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार पटेल, एन. व्ही.गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली.तेव्हा पटेलांनी जाहीर केले: ‘या शुभ नववर्षदिनी आम्हीसोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.’जुनागड प्रशासन, जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या.सुमारे 5,000 एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणिसांस्कृतिक केंद्रासाठी राखीव आहे. म. गांधींच्यासल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतूनमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्याचाधार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेलेसांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल. आज सोमनाथ हे केवळपर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही, तो दगड आणिगाळात लिहिलेला भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे.सोमनाथ आपल्याला शिकवते की पडूनही पुन्हा पुन्हा उभेराहणे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हे मंदिर केवळ भगवानशिवाचे स्मारक नाही तर त्या अदम्य मानवी आत्म्याचेप्रतीक आहे, जे शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊनशांतपणे म्हणत राहते— गझनीचा महमूद आपल्या पंधराव्यामोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिनालुटण्यात आला. पुरातत्त्वीय पुरावेदर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले.म्हणजेच श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- पुण्यात खळबळ! चिंचवडच्या जत्रेत थेट 'Made in Pakistan' चादरींची विक्री? धुलाईनंतर गुपित उघड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं सुवर्णपदक मिळवण्याचा निर्धार.
महाराष्ट्र
- पुण्यात खळबळ! चिंचवडच्या जत्रेत थेट 'Made in Pakistan' चादरींची विक्री? धुलाईनंतर गुपित उघड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं सुवर्णपदक मिळवण्याचा निर्धार.
- पुण्यात गॅस गळतीने भीषण स्फोट! आई, वडील आणि मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; खांदवेनगरमधील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त
गुन्हा
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
राजकीय
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
























Subscribe to my channel



