‎‎‎‎‎‎‎‎ब्रिजेश सिंह यांचा कॉलम:भग्न अवशेषांपासून अखंड‎श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा‎

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947‎रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार‎वल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. समुद्रकिनारी उभे राहून‎त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले‎आणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली.‎आणि आता 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथ‎अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित‎तेजात सहभाग घेतला. तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने‎प्रज्वलित झाल्यासारखी वाटते.‎ सोमनाथ मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासून‎प्रभास पाटण मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. 3000‎पासून येथे शेती, पशुपालनाची पूर्व-हडप्पा संस्कृती‎अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथे‎जीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर ‎‎मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष ‎‎देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण ‎‎महत्त्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेले दगडी‎नांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत.‎ इ.स. 725 मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द ‎‎अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला. हे पहिले इस्लामी ‎‎आक्रमण मानले जाते. परंतु सर्वात मोठा आघात 8‎जानेवारी 1026 रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूद‎आपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला.‎शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला.‎पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेष‎एकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच श्रद्धा‎उद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. 1038 मध्ये गोव्याच्या कदंब‎राजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजाअर्चा,‎पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचे‎दिसते. इ.स. 1169 मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवे‎भव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकाली‎मंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर‎1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खानने‎मंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणि‎पदमल यांनी मंदिररक्षणासाठी प्राण दिले. पुढे चुडासमा‎राजा महिपाल देव यांनी 1308 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण‎केले. त्यांचे पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.‎मग झफर खानने 1395 मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथे‎जामा मशीद, प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेख‎आहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आणि नंतर‎औरंगजेबाच्या आदेशाने 1665 आणि 1706 मध्ये पुन्हा‎विध्वंस घडवून आणण्यात आला. परंतु तीर्थक्षेत्र टिकून‎राहिले. इ.स. 1782–83 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी‎होळकरांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळ‎नवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर 19 व्या आणि 20 व्या‎शतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले.‎ स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये जुनागड भारतात‎विलीन झाले. हिंदू मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यात‎आली. 12, 13 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार पटेल, एन. व्ही.‎गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली.‎तेव्हा पटेलांनी जाहीर केले: ‘या शुभ नववर्षदिनी आम्ही‎सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.’‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जुनागड प्रशासन, जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या.‎सुमारे 5,000 एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणि‎सांस्कृतिक केंद्रासाठी राखीव आहे. म. गांधींच्या‎सल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतून‎मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्याचा‎धार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेले‎सांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल.‎ आज सोमनाथ हे केवळ‎पर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही, तो दगड आणि‎गाळात लिहिलेला भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे.‎सोमनाथ आपल्याला शिकवते की पडूनही पुन्हा पुन्हा उभे‎राहणे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हे मंदिर केवळ भगवान‎शिवाचे स्मारक नाही तर त्या अदम्य मानवी आत्म्याचे‎प्रतीक आहे, जे शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊन‎शांतपणे म्हणत राहते—‎ गझनीचा महमूद आपल्या पंधराव्या‎मोहिमेत सोमनाथावर चालून आला.‎शिवलिंग फोडण्यात आले, खजिना‎लुटण्यात आला. पुरातत्त्वीय पुरावे‎दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेष‎एकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले.‎म्हणजेच श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *