भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदारवल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. समुद्रकिनारी उभे राहूनत्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिलेआणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली.आणि आता 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथअमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापिततेजात सहभाग घेतला. तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्यानेप्रज्वलित झाल्यासारखी वाटते. सोमनाथ मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासूनप्रभास पाटण मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. 3000पासून येथे शेती, पशुपालनाची पूर्व-हडप्पा संस्कृतीअस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथेजीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्त्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेले दगडीनांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. इ.स. 725 मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला. हे पहिले इस्लामी आक्रमण मानले जाते. परंतु सर्वात मोठा आघात 8जानेवारी 1026 रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूदआपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला.पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच श्रद्धाउद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. 1038 मध्ये गोव्याच्या कदंबराजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजाअर्चा,पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचेदिसते. इ.स. 1169 मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवेभव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकालीमंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खाननेमंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणिपदमल यांनी मंदिररक्षणासाठी प्राण दिले. पुढे चुडासमाराजा महिपाल देव यांनी 1308 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणकेले. त्यांचे पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.मग झफर खानने 1395 मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथेजामा मशीद, प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेखआहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आणि नंतरऔरंगजेबाच्या आदेशाने 1665 आणि 1706 मध्ये पुन्हाविध्वंस घडवून आणण्यात आला. परंतु तीर्थक्षेत्र टिकूनराहिले. इ.स. 1782–83 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळनवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर 19 व्या आणि 20 व्याशतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले. स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये जुनागड भारतातविलीन झाले. हिंदू मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यातआली. 12, 13 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार पटेल, एन. व्ही.गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली.तेव्हा पटेलांनी जाहीर केले: ‘या शुभ नववर्षदिनी आम्हीसोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.’जुनागड प्रशासन, जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या.सुमारे 5,000 एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणिसांस्कृतिक केंद्रासाठी राखीव आहे. म. गांधींच्यासल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतूनमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्याचाधार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेलेसांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल. आज सोमनाथ हे केवळपर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही, तो दगड आणिगाळात लिहिलेला भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे.सोमनाथ आपल्याला शिकवते की पडूनही पुन्हा पुन्हा उभेराहणे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हे मंदिर केवळ भगवानशिवाचे स्मारक नाही तर त्या अदम्य मानवी आत्म्याचेप्रतीक आहे, जे शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊनशांतपणे म्हणत राहते— गझनीचा महमूद आपल्या पंधराव्यामोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिनालुटण्यात आला. पुरातत्त्वीय पुरावेदर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले.म्हणजेच श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



