पुणे : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये आतापर्यंत ९.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ९.९१ टक्के म्हणजेच ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ४ मेपर्यंत हा पाणीसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ग्रामीण भागासाठी उन्हाळी हंगामासाठी ११ मार्चपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन १० मेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या काळात सहा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार असून या कालावधीत तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सलग ९० दिवस उन्हाळय़ात पिकांसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, यंदा कडक उन्हाळा असल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होत असून पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून पाणीचोरीतही वाढ झाली आहे, असे निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदविण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातही सध्या २.९७ टीएमसी म्हणजेच केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या नऊ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. महापालिकेला प्रतिमहिना सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. उपनगरांमध्ये नागरीकरणही मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे महापालिकेला त्यापेक्षा अधिक पाणी घ्यावे लागत आहे. उच्च न्यायालयाने समाविष्ट २३ उपनगरांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरालगतच्या अन्य उपनगरांमध्येही खासगी टँकरने पाणी घेतले जात आहे. या बाबी लक्षात घेतल्या तर जलसंपदा विभागाला पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागणार आहे.
शहर
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
महाराष्ट्र
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



