
पुणे: ऐन दिवाळीच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. मात्र, त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून, राज्यात या काळात बहुतांश भागात कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात देशातील हे पहिले चक्रीवादळ असून, त्याचा फटका पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील पावसाळी स्थिती सध्या निवळत असून, मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला वेग मिळत आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस होतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागामध्ये पावसाळी स्थिती दूर होऊन कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. पुढील एक-दोन दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत काही भागांतच पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्रात आणि परिसरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. २२-२३ ऑक्टोबरला त्याचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरला पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे चक्रीवादळ २५ ऑक्टोबरला पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात पश्चिम बंगाल आणि काही प्रमाणात ओडिसाच्या किनारपट्टीला या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
मोसमी वाऱ्यांच्या परतीला बिलंब
महाराष्ट्रातून सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. १४ ऑक्टोबरला राज्यातून हा प्रवास सुरू झाला असला, तरी आठवड्यापासून अरबी समुद्रातून येणारे बाष्प आणि त्यातून होणाऱ्या पावसामुळे या प्रवासाला विलंब होतो आहे. परतीच्या प्रवासाच्या सर्वसाधारण नियोजित तारखांनुसार संपूर्ण देशातून १५ ऑक्टोबर, तर महाराष्ट्रातून १३ ऑक्टोबरपर्यंत परतीचा प्रवास पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या त्यास पाच दिवसांचा विलंब झाला आहे. सध्या परतीच्या प्रवासाने पुन्हा वेग घेतला असून, गुरुवारी विदर्भाच्या काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले. पुढील दोन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी वारे माघारी जातील.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




