दादांची शेवटची इच्छा पूर्ण करावी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, प्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक वक्तव्य

image

Sayaji Shinde statement on NCP merger latest news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं अन् दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, असे सयाजी शिंदे म्हणालेत. ते पुण्यात बोलत होते.

सयाजी शिंदे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं या निवडणुकीच्या वेळेला की आता एकत्र येणार यावर चर्चा सुरू असल्याचे समजतेय.'

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशा प्रकारची चर्चा झाली असताना अचानक काहीतरी वेगळे घडणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. जर पक्षाची ताकद वाढवायची असेल, तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सयाजी शिंदे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले असून, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *