केरळ : धावपट्टीवरून ‘देवा’ची मिरवणूक काढण्यासाठी केरळातील विमानतळावर पाच तास उड्डाणे स्थगित

केरळातील तिरुवअनंतपूरम हे मंदिर मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलं. या विमानतळाच्या धावपट्टीवरून दरवर्षीप्रमाणे देवाची मिरवणूक काढण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाट मोकळी करून दिली. या कालावधीत तिरुवअनंतपूरम विमानतळावर कोणत्याही विमानाचं उड्डाण झालं नाही. हे विमानतळ दरवर्षी दोन वेळा प्रत्येक पाच तासांसाठी बंद ठेवलं जातं. मागील अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जात आहे.

विशेष म्हणजे देवाची ही मिरवणूक विमानतळाच्या धावपट्टीवरून काढली जाते. ज्यामध्ये, हजारो भाविकांसह हत्तींचा समावेश असतो. ही पाच हजार वर्षांची परंपरा आहे. वर्षातून दोन वेळा ही मिरवणूक काढली जाते, यंदा १ नोव्हेंबर रोजी हा उत्सव पार पडला. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील विमानतळावरुन कुठल्याही विमानाचे उड्डाण किंवा लँडींग झालं नाही. या कालावधीत ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह एकूण ६ विमानांची उड्डाण थांबवण्यात आली.

तिरुवअंतपूरम विमानतळ परिसरातील पद्मनाभ स्वामी मंदिरातून भगवान विष्णू यांची पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या शांघमुघम समुद्रकिनारी नेण्यात येते. येथे भगवान विष्णू यांना स्नान घालण्यात येते. मागील हजारो वर्षांपासून ही परंपरा जोसापली जात आहे. पण १९३२ मध्ये याठिकाणी विमानतळ बांधण्यात आलं. त्यामुळे, ही पंरपंरा जपत भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत विमानतळाची सेवा वर्षातून दोनवेळा प्रत्येकी ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते.
 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *