एकच चर्चा होती ताईंना दादांच्या जागी घेतलं पाहिजे! नरहरी झिरवळ नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर TV9 मराठीशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. मंत्रालयात ५० हजार रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते. या प्रकरणी हेतुपुरस्सर कोणी त्रास देत नसल्याचे सांगत, चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर ताईंनी (सुनैत्रा पवार) त्यांना समज दिल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या. त्या दिवशी ताईंनी समज दिली नाही किंवा तशी चर्चाही नव्हती, असे त्यांनी नमूद केले. ताईंना दादांच्या (अजित पवार) जागी घेतले पाहिजे, अशी एकच चर्चा होती, असे ते म्हणाले. दादांच्या जाण्याने मोठा फटका बसल्याचेही त्यांनी मान्य केले. एसीबीच्या कारवाईनंतर अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा कलंक पुन्हा लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे झिरवळ यांनी सांगितले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *