
पुणे : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या अतिवृष्टीचा, संततधार पावसाचा फटका राज्यातील डाळिंब उत्पादकांना बसला आहे. आंबिया बहरातील सुमारे ४० टक्क्यांवरील डाळिंबाचे पीक फळकुज आणि तेलकट रोगामुळे मातीमोल झाले आहे. संततधार पावसाचा फटका सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मुळातच खोडकिडी, तेल्या रोगाने राज्यातील सुमारे ७० टक्के डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत. आता उरलेल्या सुमारे ५० हजार हेक्टरवरील बागाही अडचणीत आल्या आहेत. मागील दहा-बारा दिवसांपासून बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी आणि संततधार पाऊस सुरू होता. अतिवृष्टीचा फारसा फटका डाळिंबाला बसत नाही. मात्र, संततधार पाऊस डाळिंबाला धोकादायक असतो. वातावरणात आद्र्रता वाढून बुरशीजन्य रोगासह तेल्या आणि फळकुज मोठय़ा प्रमाणात झाली आहे. आंबिया बहरात घेतलेल्या एकूण बागांपैकी ४० टक्क्यांवरील बागांना या पावसाचा फटका बसला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात डाळिंब बाजारात यावीत. चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी आंबिया बहर घेतात. या बहरात उत्पादित झालेले डाळिंब शक्यतो स्थानिक, देशांअर्तगत बाजारातच विकली जातात. काही प्रमाणात बांगलादेशसह आखाती देशांना निर्यात होते. युरोपीय देशांना आंबिया बहरातील डाळिंबे निर्यात होत नाहीत.
मृग बहरालाही फटका? डाळिंबाचे आता जे नुकसान दिसते आहे, तो आंबिया बहरातील आहे. फळे साधारणपणे १५० ते २०० ग्रॅम वजनाची झाली आहेत. ही फळे काळी पडून, फुटून गळून पडत आहेत. जी फळे झाडावर आहेत, तीही अखेपर्यंत चांगली राहतील, असे दिसत नाही. काही बागा शंभर टक्के तर काही बागांचे ५० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. मृग बहरातील फळे आता कळी, फुलोरा अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान अद्याप समोर आले नाही. मात्र, पाणी जास्त झाल्यास डाळिंबाच्या कळय़ा, फुले गळून जाण्याचा धोका आहेच.
राज्यातील डाळिंबाचे मोठे क्षेत्र या पूर्वीच खोडकिडी आणि तेल्या रोगाला बळी पडले आहे. आता झालेला पाऊस डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठय़ा नुकसानीचा ठरला आहे. आंबिया बहर घेतलेल्या शेतकऱ्यांचे सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. खोडकिडी, तेल्यासारख्या रोगांचे चक्रच सुरू झाले आहे. आंबिया, मृग आणि हस्त, अशा वेगवेगळे बहर घेतले जात असल्यामुळे रोगांची, किडीची साखळी खंडित होत नाही. ही साखळी खंडित होण्यासाठी पुढील किमान दोन वर्षे डाळिंबाची नव्याने होणारी लागवड थांबविली पाहिजे. अन्यथा उरलेल्या बागाही तोडून काढव्या लागतील.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




