
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामातील पिकांसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यातील ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. विमा काढण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या चोवीस तासांत विक्रमी ५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाचे राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी आपला विमा हप्ता भरून पीकविमा घेतला आहे. विभागनिहाय आकडेवारी पाहता औरंगाबाद विभाग आघाडीवर असून, सर्वाधिक २३ लाख ८३ हजार ९०४ शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. त्या खालोखाल लातूर विभागात २९ लाख १३ हजार ३९ शेतकऱ्यांनी, पुणे विभागातील २४ लाख २३२ शेतकऱ्यांनी, नाशिक विभागातील २२ लाख १ हजार ८४८ शेतकऱ्यांनी, नागपूर विभागातील २० लाख ४८९ शेतकऱ्यांनी, अमरावती विभागात १० लाख ३१ हजार ३९३ शेतकऱ्यांनी आणि सर्वात कमी कोकण विभागातील ५९ हजार ९३७ शेतकऱ्यांनी आपला हप्ता भरून विमा काढला आहे.
४१ लाख ५४ हजार १६६ हेक्टर क्षेत्र संरक्षित
अर्ज केलेल्या ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २९ लाख २३ हजार ३८२ असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ६७ लाख ७१ हजार ३७ इतकी आहे. या शेतकऱ्यांनी ४१ लाख ५४ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा घेऊन संरक्षित केले आहे. एकूण संरक्षित विमा रक्कम २०२८६.४३ कोटी रुपये इतकी असून, एकूण विमा हप्ता ३२७२.२२ कोटी रुपये इतका आहे. त्यात शेतकरी जमा हप्ता ४६४.२० कोटी रुपये, राज्य सरकारचा वाटा १४०५.०४ कोटी रुपये आणि केंद्र सरकारचा वाटा १४०२.९८ कोटी रुपये इतका आहे.
केंद्र सरकारचे पीकविमा संकेतस्थळ आणि राज्याचे महाभूमी अभिलेखचे संकेतस्थळ व्यवस्थित चालल्यामुळे शेतकरी सरकारी सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतरही विमा काढू शकले. मागील २४ तासांत साडेपाच लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, इतक्या मोठय़ा क्षमतेने ऑनलाइन काम सुरू आहे.
– विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




