
लातूर : राज्यभरातील वेगवेगळय़ा भागांतून भिन्न आर्थिक स्तरातील विद्यार्थी शिक्षणकेंद्र म्हणून लातूरमध्ये येतात. यांतील बहुतांश विद्यार्थी न्याहारीसह जेवणापर्यंतच्या सर्व आहारगरजांसाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनजीकच्या खानावळींवर अवलंबून असतात. महागाईमुळे या खानावळींनी मंगळवारी दरवाढ करीत एक दिवसाचा लाक्षणिक बंद केल्याने या विद्यार्थाना सक्तीचा उपवास घडला. त्यामुळे विद्यार्थीही रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
बारावी आणि त्यानंतर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या तयारीचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या लातूर शहरातील खानावळ चालकांनी महागाई वाढल्याने खानावळीचे दर १ हजार ८०० वरून १ सप्टेंबरपासून २ हजार ४०० रुपये केले. ही महागाईची झळ किती अधिक आहे हे सरकारला कळावे म्हणून त्यांनी खानावळी बंद ठेवत निषेध आंदोलन केले. परिणामी पाच हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आणि तेही रस्त्यावर उतरले, आणि लातूर शहरात दिवसभर गोंधळ निर्माण झाला.
पोलीस यंत्रणेला ही बाब कळली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी मेसचे प्रमुख आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून तोडगा काढला. खानावळीचे भाव वाढवायचे असतील तर ते टप्प्याटप्प्याने वाढवा. एकदम सहाशे रुपये भाववाढ करणे विद्यार्थ्यांला परवडणार नाही, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचेही हेच म्हणणे होते. एकाच महिन्यात वाढ होण्यापेक्षा आता २०० रुपये व गरज भासल्यास तुम्ही दिवाळीच्यावेळी भाव वाढवा, असे ठरले. या चर्चेनंतर दुपारपासून मेस सुरू करण्याचा निर्णय मेसच्या संघटनेने घेतला व विद्यार्थ्यांचाही रोष कमी झाला.
खाडगाव परिसरामध्ये सुमारे ३० ते ४० अभ्यासिका व एवढय़ाच खानावळी आहेत. एका खानावळीमध्ये किमान २०० ते २५० विद्यार्थी जेवण घेतात, त्यामुळे पाच हजार विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
मे महिन्यात लातूर शहरातील मेसचे भाव हे दरमहा व्यक्तीसाठी १ हजार ८०० रुपये होते, जून महिन्यात ते वाढवून २ हजार रुपये करण्यात आले. मात्र पेट्रोल, डिझेलपासून सर्वच भाव वाढत आहेत, त्यामुळे आम्हाला भाववाढ करणे अपरिहार्य असल्याचे खानावळ मालकांनी सांगितले. त्यांनी खाडगाव मेस असोसिएशन स्थापन करून १ सप्टेंबरपासून खानावळींचे दर २ हजार ४०० रुपये महिना असे केले.
लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील खाडगाव रस्त्यावरील सुमारे २५ खानावळी अचानक लाक्षणिक बंदच्या नावाखाली मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या खानावळीमध्ये विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. या विद्यार्थ्यांनी मग रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
लातूर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुमारे दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तर, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांची संख्या ही २५ हजारांपेक्षा अधिक आहे. दररोज २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी मेसमध्ये जेवण घेतात.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
