
लातूर : राज्यभरातील वेगवेगळय़ा भागांतून भिन्न आर्थिक स्तरातील विद्यार्थी शिक्षणकेंद्र म्हणून लातूरमध्ये येतात. यांतील बहुतांश विद्यार्थी न्याहारीसह जेवणापर्यंतच्या सर्व आहारगरजांसाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनजीकच्या खानावळींवर अवलंबून असतात. महागाईमुळे या खानावळींनी मंगळवारी दरवाढ करीत एक दिवसाचा लाक्षणिक बंद केल्याने या विद्यार्थाना सक्तीचा उपवास घडला. त्यामुळे विद्यार्थीही रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
बारावी आणि त्यानंतर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या तयारीचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या लातूर शहरातील खानावळ चालकांनी महागाई वाढल्याने खानावळीचे दर १ हजार ८०० वरून १ सप्टेंबरपासून २ हजार ४०० रुपये केले. ही महागाईची झळ किती अधिक आहे हे सरकारला कळावे म्हणून त्यांनी खानावळी बंद ठेवत निषेध आंदोलन केले. परिणामी पाच हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आणि तेही रस्त्यावर उतरले, आणि लातूर शहरात दिवसभर गोंधळ निर्माण झाला.
पोलीस यंत्रणेला ही बाब कळली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी मेसचे प्रमुख आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून तोडगा काढला. खानावळीचे भाव वाढवायचे असतील तर ते टप्प्याटप्प्याने वाढवा. एकदम सहाशे रुपये भाववाढ करणे विद्यार्थ्यांला परवडणार नाही, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचेही हेच म्हणणे होते. एकाच महिन्यात वाढ होण्यापेक्षा आता २०० रुपये व गरज भासल्यास तुम्ही दिवाळीच्यावेळी भाव वाढवा, असे ठरले. या चर्चेनंतर दुपारपासून मेस सुरू करण्याचा निर्णय मेसच्या संघटनेने घेतला व विद्यार्थ्यांचाही रोष कमी झाला.
खाडगाव परिसरामध्ये सुमारे ३० ते ४० अभ्यासिका व एवढय़ाच खानावळी आहेत. एका खानावळीमध्ये किमान २०० ते २५० विद्यार्थी जेवण घेतात, त्यामुळे पाच हजार विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
मे महिन्यात लातूर शहरातील मेसचे भाव हे दरमहा व्यक्तीसाठी १ हजार ८०० रुपये होते, जून महिन्यात ते वाढवून २ हजार रुपये करण्यात आले. मात्र पेट्रोल, डिझेलपासून सर्वच भाव वाढत आहेत, त्यामुळे आम्हाला भाववाढ करणे अपरिहार्य असल्याचे खानावळ मालकांनी सांगितले. त्यांनी खाडगाव मेस असोसिएशन स्थापन करून १ सप्टेंबरपासून खानावळींचे दर २ हजार ४०० रुपये महिना असे केले.
लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील खाडगाव रस्त्यावरील सुमारे २५ खानावळी अचानक लाक्षणिक बंदच्या नावाखाली मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या खानावळीमध्ये विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. या विद्यार्थ्यांनी मग रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
लातूर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुमारे दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तर, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांची संख्या ही २५ हजारांपेक्षा अधिक आहे. दररोज २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी मेसमध्ये जेवण घेतात.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


