बोरिया मजुमदार यांचा कॉलम:आयपीएल बनले गुणवत्तेचा‎ शोध घेणारे सर्वात मोठे केंद्र

‎‎‎‎‎‎‎‎‎‎डिसेंबर 2025 मध्ये आयपीएलचे लिलाव सुरू होते.‎तेव्हा धार्मिक वृत्तीचे प्रफुल्ल हिंगे एका मंदिरात होते.‎तिथेच त्यांना समजले की, एसआरएचने त्यांना 30 ‎लाखात विकत घेतले आहे. 2023 मध्ये हिंगेला पाठीला ‎गंभीर दुखापत झाली होती. अनेकांना वाटले होते की तो‎यातून कधीच सावरू शकणार नाही. परंतु अपार‎कष्टानंतर अखेर तो एसआरएचसाठी हातात चेंडू घेऊन‎मैदानात उतरला. त्याच्यासमोर आयपीएलमधील उत्तुंग‎यशकथांपैकी एक असलेला वैभव सूर्यवंशी होता. पण‎हिंगे दडपणाखाली आला नाही. त्याचा स्वतःवर विश्वास ‎‎होता. तो स्वतःचे नशीब स्वतःच लिहित होता. पहिल्याच ‎‎स्पेलमध्ये तीन विकेट्स घेत त्याने तेच करून दाखवले.‎ मुकुल चौधरीनेही हेच केले. ईडन गार्डन्सवर‎केकेआरविरुद्ध 130 धावांवर 7 गडी गमावल्यानंतर ‎‎एलएसजी स्पष्टपणे दबावात होती. तेव्हाच मुकुल‎चौधरीने मोकळेपणाने खेळण्याचा निर्णय घेतला. ‎‎आयपीएलपूर्वी फार कमी लोकांनी त्याचे नाव ऐकले‎होते. हो, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या ‎‎जोरावर ही चर्चा नक्कीच होती की हा तरुण खेळाडू‎चेंडूवर जोरदार प्रहार करतो. पण प्रकाशझोतापासून दूर‎एखाद्या स्थानिक स्पर्धेत खेळणे आणि आयपीएलमध्ये‎खेळणे यात खूप मोठा फरक आहे. हा फरक एखाद्या‎दुसऱ्या श्रेणीतील क्लबसाठी खेळणे व चॅम्पियन्स‎लीगमध्ये खेळणे यासारखेच आहे. कोट्यवधी प्रेक्षक‎आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यामुळे‎आयपीएलला सर्व भव्य खेळांची जननी म्हणता येईल.‎आणि ईडन गार्डन्सच्या त्या रंगमंचावर चौधरीच मुख्य‎नायक होता. हे फक्त प्रफुल्ल किंवा मुकुलबद्दलच नाही.‎समीर रिझवीपासून प्रियांश आर्य आणि साकिब‎हुसेनपर्यंत- हे नवीन चेहरेच आयपीएलची खरी ओळख‎आहेत. यातील प्रत्येक नावामागे एक कथा आहे. साकिब‎हुसेनचेच उदाहरण घ्या. बिहारच्या गोपालगंज आणि‎सिवानच्या धुळीने माखलेल्या मैदानांवर त्याला त्याच्या‎खऱ्या नावाने कोणी ओळखत नव्हते. तात्पुरत्या‎खेळपट्ट्यांवर टेनिस बॉल क्रिकेट पाहण्यासाठी‎जमणाऱ्या स्थानिकांसाठी वेगाने गोलंदाजी करणारा तो‎उंच-सडपातळ तरुण फक्त ‘रबाडा'' म्हणून ओळखला‎जायचा. गोपालगंजचा ‘रबाडा'' ते सोशल मीडियावर ट्रेंड‎होण्यापर्यंतचा या तरुणाचा प्रवास खूप मोठा आहे. वैभव‎सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य ही तर आयपीएल‎खेळाडूंचे आयुष्य कसे बदलते, याची उत्तम उदाहरणे‎आहेत. यांपैकी कोणीही समोरच्या गोलंदाजाच्या‎नावाच्या वलयाने दडपणाखाली येत नाही. ते‎गोलंदाजाला नाही तर फक्त चेंडूला खेळत असतात. जर‎वैभवने असा विचार केला असता की ते बुमराह किंवा‎हेझलवूडचा सामना करत आहेत, तर त्यांनी कधीच ते‎फटके मारले नसते. त्यांनी प्रत्यक्षात मारले. ते फक्त‎चेंडूवर लक्ष केंद्रित करत होते. ते स्वतःचे नशीब स्वतःच‎लिहित होते. तसे करताना संघाला विजयाकडे नेत होते.‎बिनधास्त , निर्भीड व सकारात्म : हे फलंदाज कोणत्याही‎क्षणी दबावात दिसत नाहीत. आयपीएलमध्ये येऊन हे‎तरुण मुलगे परिपक्व होतात आणि स्वतःला मोठ्या‎व्यासपीठासाठी तयार करतात. वर उल्लेख केलेल्या‎खेळाडूंपैकी कोणीही दडपणाला बळी पडणारे नाही. मग‎ते अपयशी का ठरत नाहीत- उदाहरणार्थ- वैभव,‎साकिब, प्रफुल्ल आणि मुकुल यांच्यासोबत गेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सामन्यात झाले. पण त्यांना माहित आहे की नेहमीच‎दुसरी संधी असते. हीच नव्या पिढीतील भारतीय‎ताऱ्यांची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्याचे‎प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांमुळे ही स्पर्धा सर्वसमावेशक‎बनली आहे. आज कोणत्याही तरुणासाठी भारतीय‎संघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण आहे, परंतु दहा‎संघांच्या आयपीएलमध्ये मार्ग काढणे त्या तुलनेत सोपे‎आहे. तुम्ही चांगली कामगिरी करताच टेलिव्हिजन व‎डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत‎पोहोचता व रातोरात स्टार बनता. आयर्लंड आणि‎युकेच्या आगामी दौऱ्यांसाठी वैभव सूर्यवंशी सारखे‎खेळाडू राष्ट्रीय संघातही स्थान मिळवू शकतात.‎ एका अर्थाने, आयपीएल ही देशातील सर्वात मोठी‎गुणवत्ता शोध मोहीम आहे. ती दरवर्षी दोन महिने चालते.‎स्वप्ने पूर्ण करते आणि महत्त्वाकांक्षांना आकार देते.‎यामुळेच आयपीएलच्या सततच्या यशाचे कारण स्पष्ट‎होते. आपल्या 19 व्या हंगामात ही स्पर्धा अधिक भव्य व‎सरस होण्याकडे वाटचाल करत आहे. आणि असे‎करताना ती आपल्याला आणखी अनेक तरुण तारे देईल.‎त्यांचे यश आपण साजरे करू शकू.‎(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)‎ बिनधास्त आणि निर्भीड, निधड्या छातीचे‎आणि सकारात्मक : हे खेळाडू कधीही‎दडपणाखाली दिसत नाहीत. हाच‎ताजातवाना दृष्टिकोन ‘आयपीएल''ला‎त्याचे खास अस्तित्व मिळवून देतो. हे‎तरुण गुणवत्तेचे केंद्र आहे. तेथे तारे‎जन्माला येतात आणि करिअर घडते.‎‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *