बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी त्यांनी कर्मच्या माध्यमातून आम्हाला जे दिलं आहे ते पाहता आमच्या त्यांच्यावर जास्त अधिकार आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी बाळासाहेब हा एक विचार असल्याने त्यावर आमचाही अधिकार असल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
उद्धव काय म्हणाले?
मुलाखतीमध्ये उद्धव यांनी बंडखोरांना बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही असंही म्हटलंय. “बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर लोक जोडे मारतील. कोणीही असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात बोलला तर लोक त्याला जोड्याने हाणतील. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजे पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका,” असं उद्धव यांनी बंडखोरांना म्हटलंय.
“प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडीलांबद्दल आदर आहे तसा प्रत्येकाला असला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावी. आज माझ्या दुर्देवाने माझे आई-वडील माझ्यासोबत नाहीत पण ते नेहमी माझ्यामध्ये आहेत. पण ज्यांचे ज्यांचे आई-वडील सुदैवाने त्यांच्यामध्ये आहेत त्यांना मी म्हणेन की असा आशीर्वाद पुन्हा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?” असा प्रश्न उद्धव यांनी बंडखोर शिंदे गटाला केलाय.
“माझ्या वडिलांच्या फोटोचा, नावाचा आधार घ्यावा लागतो याचा अर्थ काय की तुमच्यात कर्तृत्व नाही. तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं,” असंही उद्धव बंडखोरांबद्दल बोलताना म्हणालेत.
नांदगावकर काय म्हणाले?
याचसंदर्भात नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांना बाळासाहेब हे एक व्यक्ती नसून विचार असल्याचं म्हटलं. “बाळासाहेबांनी त्यांना जन्म दिला पण आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांना कर्म देऊन त्यांनी जन्म दिलेला आहे. ते त्यांचे वडील असले तरी त्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर,” असं नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बाळासाहेबांबद्दल बोलताना नांदगावकर यांनी, “कर्माने त्यांनी आम्हाला मोठं केलं आहे. बाळासाहेब हा एक विचार आणि संस्कार आहे. ते आम्हाला पुढे घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं. निश्चितपणे प्रत्येकाचा त्याच्या संस्थेवर अधिकार आहे पण विचारांवर आमचाही अधिकार आहे,” असं नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.
राज उद्धव दोघांचीही हिंदुत्वाची भूमिका…
“हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे मांडत असतानाच उद्धव ठाकरेही हिंदुत्वाची भूमिका मांडताना दिसतायत. त्याकडे कसं पाहता?” या प्रश्नावर, “प्रत्येकाला आपआपला पक्ष पुढे कसा घेऊन जायचा याचा अधिकार आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जातोय. त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी,” असं नांदगावकर म्हणाले.
शिंदे गट हिंदुत्वाला पुढे नेत आहे का?
“शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे खरोखर हिंदुत्वाचा पुढे घेऊन जात आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला असताना राज ठाकरेच हे बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचं नांदगावकर म्हणाले. “राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. हे मी आज नाही तर वर्षानूवर्षे बोलत आलोय. पुढेही बोलत राहणार,” असं नांदगावकर म्हणाले. तसेच, “यामागील कारण असं आहे की त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेले आहेत. त्यांना त्यांची (बाळासाहेबांची) भावना आणि भूमिका पूर्णपणे ठाऊक आहेत. आता मागचं सरकार होतं त्यावेळी ते सरकार आम्ही तशी भूमिका घेऊन चाल्याचं दाखवत होते.
पण लोकांना ते भावत नव्हतं. राज बोलतात ते लोकांना भावतं. आता जे सरकार आलंय ते बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाईल अशी अपेक्षा आम्ही धरुन चालेलो आहोत. कारण ते ही तसं बोलतायत. पहिल्या १५ दिवसांमध्ये नाही कळणार,” असंही नांदगावकर म्हणाले.
राज परखडपणे बोलतात…
“राज ठाकरे नेहमीच अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या जे पोटात आहे तेच ओठात असतं. त्यामुळे ते आपली भूमिका ठापणे मांडत असतात. त्यांनी मुलाखतीत तशीच भूमिका तशाच पद्धतीने मांडली. अनेकांना ती भूमिका फार आवडल्याचं दिसत आहे. ही गोष्ट खरी आहे त्यांच्या स्पष्टवक्तेपणेमुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. त्यांनी दिलेलं भाषण, मुलाखत किंवा वक्तव्य असो किंवा त्यांनी लिहिलेलं पत्रं असो
ते नेहमीच चर्चेत राहतं,” असंही नांदगावकर म्हणाले.
त्या शिवसैनिक आणि मनसैनिकामध्ये फरक नाही
“मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तोच विचार आता राज ठाकरे महाराष्ट्राभरात नेत आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या विचाराचा मनसैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही,” असंही नांदगावकर म्हणाले.
शहर
- Chembur Fire : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर
- Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट
- Mumbai : मुंबईत मोठी दुर्घटना, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
- Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
महाराष्ट्र
- Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ
- Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक
- Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी
- Beed News : बँक शाखा व्यवस्थापकास पाईपने मारहाण; घटनेनंतर बँक अधिकारी कर्मचाऱ्यांचा तहसीलवर मोर्चा
गुन्हा
- Pune Crime : बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर
- Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार
- Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा..! धावत्या स्कूल बसमध्ये २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
- Pune Police : आधी हप्ता घेतला, नंतर बेडशीटही पळवल्या; पुण्यात दोन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन
राजकीय
- Maharashtra Politics : पुण्यात मनसेला मोठं खिंडार, जयंत पाटलांनी गेम केला; राज ठाकरेंचा विश्वासू नेताच फोडला
- Maharashtra Politics : मराठा ओबीसी वाद मिटणार? आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, शरद पवारांसह दोन्ही ठाकरेंना निमंत्रण
- Uddhav Thackeray : 'पापाचा घडा लपवण्यासाठी...'; 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
- Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार, राजू शिंदेंसह ६ माजी नगरसेवक ठाकरे गटात
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Desh Videsh : इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ; भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
- Israel Hezbollah War Updates : इस्रायल-लेबनॉनचा संघर्ष चिघळला, हेझबोलाविरोधात आता जमिनीवरून हल्ले !
- Pakistani family in India: पाकिस्तानी कुटुंबानं ‘शर्मा’ नाव लावून बंगळुरूत केलं वास्तव्य; ‘असं’ फुटलं बिंग
- MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर