
पुणे : राज्यातील अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती निवळली असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यापाठोपाठ आता राज्याच्या सर्वच भागांत थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढणार आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असल्याने या भागातील गारव्यात वाढ झाली आहे. पुढील एक-दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानात घट होणार आहे.
बंगालचा उपसागर आणि त्यानंतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दक्षिणेकडील तमिळनाडू आणि जवळच्या राज्यांत जोरदार पाऊस झाला. केरळमध्येही पावसाची हजेरी होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रामुख्याने दक्षिणेकडील भागांत अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातून रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थंडी कमी झाली. सध्या दक्षिणेकडील पावसाळी स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यातही निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर-दक्षिण भारतात रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होणार आहे. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रातील किमान तापमानात काही प्रमाणात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा सध्या तरी राज्यावर कोणता परिणाम होणार नसल्याचे दिसते आहे. या काळात राज्यातील तापमानात घट होणार आहे. निरभ्र आकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात मात्र काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात किंचित चढ-उतार होऊ शकतात. राज्यात आठवड्यात कुठेही पावसाळी स्थिती किंवा पावसाची शक्यता नाही.
विदर्भात सर्वाधिक गारवा
कोरडे हवामान आणि निरभ्र स्थितीमुळे सध्या विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. बुधवारी (१६ नोव्हेंबर) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ४.२ अंशांनी कमी होते. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आदी भागांतही सरासरीच्या तुलनेत किमान तापमान २ ते ४ अंशांनी घटले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत १३ ते १४ अंशांवर आणि सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांच्या खाली तापमानाचा पारा आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात मात्र सरासरीजवळ तापमानाची नोंद होते आहे.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
