पंतप्रधानांनी 18 एप्रिल रोजी ‘देशाला उद्देशून भाषण’(संबोधन) दिले होते. सरकारचे प्रमुख असल्याने त्यांना तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, ते संपूर्ण देशाचे पंतप्रधानही आहेत. त्यांचे पद पक्षीय नसून घटनात्मक आहे. म्हणूनच, राष्ट्राच्या नावे भाषणातून एका अलिखित पण अपेक्षित तत्त्वाचे पालन होण्याची अपेक्षा केली जाते. ते तत्त्व असे की, असे भाषण पक्षीय राजकारणाच्या प्रसंगांपासून दूर असावे. त्यातून नागरिकांना ‘नागरिक’ म्हणून मार्गदर्शित केले पाहिजे, ‘मतदार’ म्हणून नाही. तसेच, त्यातून समस्यांचे समाधान मांडले जावे आणि विविध दृष्टिकोन स्पष्ट केले जावेत. पारंपरिकदृष्ट्या अशी विशेष भाषणे महत्त्वाच्या प्रसंगीच दिली गेली आहेत. युद्ध, आर्थिक संकट, महामारी, नैसर्गिक आपत्ती किंवा महत्त्वाच्या धोरणात्मक घोषणा. जेव्हा पं. जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण दिले होते, तेव्हा त्यांच्या त्या भाषणात एका सांस्कृतिक संक्रमणाची मार्मिक अभिव्यक्ती होती. जेव्हा इंदिरा गांधी यांनी 1971 च्या युद्धादरम्यान देशाला उद्देशून भाषण केले, तेव्हा ते संघर्षाच्या काळात देशाला स्थिर करण्यासाठी होते. अलीकडच्या काळात, जागतिक आर्थिक संकटाच्या वेळी मनमोहन सिंग किंवा कोविड-19 महामारीच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी केलेली भाषणेदेखील लोकांना माहिती देणे, आश्वस्त करणे आणि एकत्र आणण्याच्या उद्देशानेच प्रसारित केली गेली होती. परंतु, जेव्हा देशाच्या नावे भाषणाचा वापर विरोधकांवर टीका करण्यासाठी केला जातो, तेव्हा ते सामान्य शिष्टाचारासोबतच घटनात्मक नैतिकतेच्या औचित्यावरही प्रश्नचिन्ह उभे करते. तांत्रिकदृष्ट्या, देशाला उद्देशून भाषणातील आशय ठरवणारा कोणताही विशिष्ट कायदा नाही. संविधानही यावर गप्प आहे. पण लोकशाही कायद्यांसोबतच परंपरांनीही चालते आणि या त्या अनिवार्य मर्यादा आहेत, ज्या संस्थात्मक अखंडता टिकवून ठेवतात. भारताचे पंतप्रधान निःसंशयपणे एक राजकारणीही असतात. ते एका पक्षाचे नेतृत्व करतात, निवडणूक लढवतात व प्रतिस्पर्धी राजकारणात सक्रिय असतात. पण जेव्हा ते देशाला उद्देशून भाषण करतात, तेव्हा त्यांची ही भूमिका बदलणे अपेक्षित असते.असे न झाल्यास राज्यसत्ता आणि राजकीय पक्ष, तसेच सरकार आणि सत्ताधारी व्यवस्था यामधीलच रेषा पुसट होण्याचा धोका निर्माण होतो. हा फरक किरकोळ नाही; तो लोकशाहीतील निष्पक्षतेच्या गाभ्याशी संबंधित आहे. अशा भाषणांसाठी वापरली जाणारी प्रसारमाध्यमे - मग ते दूरदर्शन असो वा ऑल इंडिया रेडिओ - ही सार्वजनिक संसाधने आहेत. ती करदात्यांच्या पैशातून चालतात आणि संपूर्ण देशाच्या निष्पक्ष सेवेसाठी असतात. तसेच, हे भाषण अशा वेळी दिले गेले जेव्हा पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडू यांसारख्या राज्यांत निवडणुकांच्या पूर्वसंध्येला आदर्श आचारसंहिता लागू होती. याची देखरेख निवडणूक आयोग करतो. ही संहिता निवडणुकांदरम्यान सर्वांना समान संधी मिळावी यासाठी बनवण्यात आली आहे. ती अधिकृत यंत्रणा, सार्वजनिक पैसा आणि सरकारी व्यासपीठांच्या अनावश्यक वापराला अंकुश लावते. अशा उल्लंघनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सक्षम आहे. आयोग सल्ला देऊ शकतो, स्पष्टीकरण मागू शकतो आणि आवश्यकता भासल्यास त्या उपक्रमांचा निषेधही करू शकतो, जे समान संधीच्या तत्त्वाला कमकुवत करतात. अशा निकषांमध्ये अधिकृत भाषणे आणि राजकीय भाषणे यांत स्पष्ट फरक करणे; राष्ट्रीय प्रसारणांमध्ये पक्षपाती मजकुरावर बंदी आणि निवडणूक कालावधीत सार्वजनिक प्रसारण व्यासपीठांचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये यासाठी सुरक्षा उपायांचा समावेश असू शकतो. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध नसून लोकशाहीतील निष्पक्षतेचे रक्षण करण्याचे प्रयत्न आहेत. निवडणूक आयोग आणि इतर राजकीय पक्षांशी चर्चा करून पंतप्रधान कार्यालय स्वतःच राष्ट्रीय भाषणांसाठी आचारसंहिता निश्चित करण्याची पुढाकार घेऊ शकते. ज्याने या कार्यालयाची प्रतिष्ठा अधिक वाढेल. जेव्हा पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण् करतात, तेव्हा ते राजकारणापेक्षा वर असलेल्या एका व्यासपीठावर असतात. त्या वेळी त्यांच्या शब्दांत सर्वसमावेशकता, संयम आणि जबाबदारीचे प्रतिबिंब उमटणे अपेक्षित आहे. एका स्पर्धात्मक लोकशाहीतही काही क्षण असे असतात, जे संपूर्ण देशासाठी असतात. देशाला उद्देशून भाषण हादेखील असाच एक क्षण आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लोकशाहीची मूल्ये अबाधित राहणे गरजेचेदेशाच्या नावे भाषणातील मजकूर निश्चित करणारा कोणताही विशिष्ट कायदा नाही. संविधानातही या विषयावर फारसे भाष्य नाही. परंतु आपली लोकशाही केवळ कायद्यांनीच नाही, तर त्या परंपरांनीही चालते ज्या मर्यादा निश्चित करत असतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




