‎‎‎‎‎‎‎‎‎‎डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:जीवनातील सुरुवातीचे 1 हजार दिवस भविष्याची गुरुकिल्ली‎

1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

विकसित भारताच्या मोठ्या स्वप्नाच्या पायामध्ये एक‎गंभीर कमतरता आहे : बाळाच्या जन्मापूर्वी आणि‎बालपणातील देखभाल आणि विकासाकडे अपुरे लक्ष‎देणे. गर्भधारणेपासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचे‎आयुष्याचे पहिले १ हजार दिवस जागतिक आरोग्य‎संघटना आणि युनिसेफद्वारे संधीची सुवर्ण खिडकी‎मानले जातात. कोणत्याही मुलाच्या शारीरिक, मानसिक,‎भावनिक भविष्याची दिशा ठरवणारा हा काळ असतो.‎

एपिजेनेटिक्स क्षेत्रातील अभ्यासानुसार गर्भधारणेपूर्वी‎पालकांचे आरोग्य, पोषण, मानसिक स्थिती, तंबाखूचा‎वापर आणि पर्यावरणीय संपर्क आणि गर्भधारणेदरम्यान‎आई मुलाच्या जनुक अभिव्यक्तीवर आणि दीर्घकालीन‎आरोग्य परिणामांवर प्रभाव टाकते. लठ्ठपणा, अंमली‎पदार्थांचे व्यसन, कुपोषण आणि पालकांमधील तणाव‎यामुळे मुलांमध्ये असंसर्गजन्य रोग, विकासास होणारा‎विलंब आणि चयापचय विकारांचा धोका वाढतो. यानंतर‎बालविकासाच्या दृष्टीकोनातून जीवनाचा दुसरा महत्त्वाचा‎टप्पा तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीपासून आठ वर्षांच्या‎वयापर्यंत असतो. एकंदरीत पहिले ३ हजार दिवस मानवी‎विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भारतात २ ते ८ वर्षे‎वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी आणि पोषण‎अभियान किंवा क्रॅश यासारख्या काही योजना आहेत.‎परंतु त्या प्रामुख्याने निम्न आणि निम्न-मध्यम उत्पन्न‎गटापुरत्या मर्यादित आहेत. दोन वर्षांच्या वयापर्यंत‎बाळाच्या मेंदूचा सुमारे ८०-८५ टक्के भाग विकसित‎झालेला असतो. त्यामुळे या टप्प्यावर दुर्लक्ष किंवा‎वंचिततेचे परिणाम अनेकदा आयुष्यभरासाठी‎अपरिवर्तनीय बनतात. म्हणूनच, गर्भधारणेपासून ते‎वयाच्या दोन वर्षांपर्यंतच्या टप्प्यावर बालविकासासाठी‎आपण समन्वित, समग्र आणि ठोस पावले उचलण्याची‎वेळ आली आहे-जिथे आरोग्य, पोषण, प्रारंभिक शिक्षण,‎भावनिक कल्याण आणि काळजी यासारखे मुद्दे एकत्र‎जोडले गेले आहेत. युवक आणि जोडप्यांसाठी विवाहपूर्व‎आणि गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनात पोषण, मानसिक‎आरोग्य, जीवनशैली आणि पिढ्यानपिढ्या होणाऱ्या‎प्रभावांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही‎सार्वजनिक आरोग्यातील सर्वात फायदेशीर‎गुंतवणुकीपैकी एक असेल. त्यामुळे एकाच वेळी दोन‎पिढ्यांना फायदा होईल. दुसरे म्हणजे पालकांना‎बालविकासाविषयी आवश्यक ज्ञान देण्याची प्रक्रिया‎बळकट केली पाहिजे. जन्मापासूनच नवजात मुलांशी‎बोलणे. त्यांना कथा वाचून दाखवणे. त्यांच्यासाठी गाणी‎गाणे. त्यांच्याबरोबर खेळणे आणि भावनिक बंध यामुळे‎त्यांचे शरीर आणि मेंदूचा विकास सुधारतो. उदाहरणार्थ-‎चार आठवड्यांच्या बाळाला देखील एक कथा सांगितली‎जाऊ शकते. यामुळे मेंदूतील मज्जातंतूंच्या जोडण्यांना‎गती मिळते आणि भविष्यातील शिकण्याची क्षमता‎बळकट होते. मुलांच्या विकासासाठी शिक्षण आवश्यक‎आहे.‎

लहान मुलांमध्ये विकासास होणारा विलंब लवकर‎ओळखणे हा त्यांची वेळेवर काळजी घेण्याचा आणि‎त्यात सुधारणा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. दोन ते‎पाच वयोगटातील मुलांसाठी दर्जेदार काळजीआवश्यक‎आहे. केवळ अन्नच नव्हे तर आयुष्यभरासाठी पोषणाची‎समज असावी .यासाठी आपल्याला शाळा एकात्मिक‎शिक्षण, आरोग्य, पोषण केंद्रे म्हणून विकसित केल्या‎पाहिजेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *