जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या काही इच्छा,अपेक्षा आणि आकांक्षा असतात. इच्छा रहित जगण्याची कल्पना कोणताही मनुष्य करू शकत नाही. जगत असताना इच्छा आणि अपेक्षा काय आहेत हे प्रत्येकाच्या आपल्या जीवनशैलीवर आणि जीवन जगण्याच्या उद्देशावर अवलंबून असते. इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा या प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडण आणि संस्कारावर अवलंबून असतात. मनुष्य हा अपूर्ण आहे. संसारात आहे म्हणजे कोणी ही अद्याप पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. अपूर्ण या अर्थाने की तो अपेक्षेच्या परिघामध्ये आहे. मनुष्याला शरीर आहे, म्हणून खाण्या-पिण्याच्या अपेक्षा आहेत. त्याला वाणी किंवा भाषा आहे म्हणून इतर व्यक्तिमत्व आणि समाजाची अपेक्षा आहे. त्याला मन आहे म्हणून मान-सन्मान, इच्छा, प्रतिष्ठा इत्यादी अपेक्षा असतात. माणूस एक असतो परंतु अपेक्षा हजारो असतात. आणि त्या सर्व अपेक्षा बाह्य जगता मधून पूर्ण होत असतात. बाह्य जगातून तो ग्रहण करतो आणि अंतर्मन भरतो. म्हणूनच त्याच्या व्यक्तिगत सीमा सामाजिक बनतात. सामाजिक संवेदनामध्ये वैयक्तिक नैतिक आचरणाची अपेक्षा असते. त्यामध्ये हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह, संग्रह याचा निषेध स्वाभाविकपणे येतोच. परंतु समाजामध्ये जगत असताना माणसाच्या व्यक्तिगत अतिरिक्त इच्छा,अपेक्षा,आकांक्षा मात्र त्याला संघर्षाकडे नेतात. आणि या कारणानेच समाजामध्ये अशांतता आणि परस्पर राग द्वेष निर्माण होतात. आध्यात्मिक आणि नैतिक नियमांनी व्यक्तीचा विकास अशा पद्धतीने अपेक्षित केला की जो बाह्य जगातून निरपेक्ष होऊन स्वतःमध्ये संतुष्ट आणि तृप्त अशा प्रकारचे जीवन जगणारा असावा. समाजामध्ये सर्वांचे संतुलित आचरण आणि स्थिरतेच्या अपेक्षेने प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक पातळीवर संयम, संतोष आणि संग्रह प्रमाण गृहीत आहे. जगणे, उपजीविका, इच्छा आणि समाधान याला एक नैतिकतेचा परीघ आहे, धार्मिकतेची किनार आहे. त्याच बरोबर अर्थशास्त्राचा दृष्टिकोन देखील आहे हे सत्य नाकारता येणार नाही.अर्थशास्त्राच्या दृष्टीने अनिवार्यता पेक्षा आवश्यकतेचे क्षेत्र मोठे असते. इच्छेचे क्षेत्र आवश्यकतेपेक्षा मोठे असते. सर्व इच्छा ह्या आवश्यकता असतातच असे नव्हे. काही इच्छा या आवश्यकतेपेक्षा अधिक, जास्त आणि मोठ्या ही असू शकतात. जगण्याच्या साधारण आवश्यकता आणि उत्पन्न इच्छा यांचे प्रमाण संतुलन हे प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर आणि संस्कारावर अवलंबून आहे हेही खरे. मनुष्य ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये जगत असताना त्याच्या उद्देशाच्या केंद्रामध्ये संतोष समाधान आहे की इच्छा आकांक्षांची पूर्तता यावर त्याच्या जीवनातील मानसिक स्थिरता अवलंबून असते. इच्छा असणे हे स्वाभाविक नैसर्गिक आहे. मनुष्याच्या आवश्यकता या भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रितीरिवाज, शारीरिक अपेक्षा, स्पर्धा, आंतरिक भावनांची पूर्तता यावर अवलंबून असतात. समाधान आणि संतोष वृत्तीने जीवन जगण्यासाठी मनुष्याला सामाजिक आर्थिक परिस्थितीशी झगडावे लागते. तो संघर्ष किती हे त्याच्या आणि आकांक्षावर अवलंबून असते. त्या इच्छा आवश्यक अनिवार्य किती आहेत आणि भौतिक अनावश्यक किती आहेत यावर जगण्यातील संघर्षाचे प्रमाण निर्धारित होते. जगणं, इच्छा आणि आवश्यकतांची पूर्तता यामध्ये अर्थशास्त्र आणि आर्थिक परिस्थिती ही अत्यंत महत्त्वाची बनते. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीच्या आवश्यकता सीमित असतात. कदाचित त्याच्या परिस्थितीमुळे त्या दमित झालेल्या असू शकतात. तो फक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक काय आहे त्याच्या पूर्ततेकडे लक्ष देऊन कार्यरत असतो. याउलट आर्थिक सुबत्ता, सुदृढता असणाऱ्या व्यक्तींच्या अतिरिक्त आवश्यकता याच अनिवार्यता बनलेल्या असतात. म्हणून तो केवळ जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता न करता त्यामध्ये विलासितायुक्त जीवनशैलीला पूर्ण करण्याच्या मागे लागलेला असतो. धर्माने प्रभावित असलेल्या व्यक्तीच्या आवश्यकता नैतिक दृष्टीने जीवनशैलीत परिवर्तित होतात. ज्या नैतिक आणि धार्मिक आदर्श यांना तो मानत असतो त्या मान्यतेनुसार त्याच्या आवश्यकता निर्माण होतात. म्हणूनच अशा व्यक्तीच्या आवश्यकता संतुलित असतात आणि जीवनामध्ये संतोष वृत्ती आणि समाधाना असते. जीवन जगत असताना कमीत कमी अनिवार्यता आणि इच्छाआधारीत आवश्यकता यानुसार मनात सतत एक द्वंद्वात्मक संघर्ष असतो. इच्छा आकांक्षांचा खड्डा इतका खोल आणि मोठा असतो की तो कधीही भरला जाऊ शकत नाही. या सत्याची स्वीकृती धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्हींनी केलेली आहे. अतिरिक्त आवश्यकता किंवा लोभ, मोह, स्पर्धा,अनियंत्रित भावना यांनी मनातील आर्तता वाढत जाते, ही आर्तता पुढे अशांती आणि रौद्रते मध्ये परिवर्तित होते. आणि अशांतता, अनैतिकता आणि हिंसेकडे वळते. अतिरिक्त इच्छा आकांक्षांची पूर्तता येण केण प्रकारेण पूर्ण करण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करावा लागतो. आणि त्यातच जीवन जगण्यासाठी जी स्थिरता आणि समाधान हवे असते ते लोप पावते. अशा प्रकारचे जगणे सतत आंतरिक शल्याचे आणि असंतुलित, अस्थिर असे होऊन जाते. विद्यमान जगामध्ये जगत असताना आपण मागे नसावे. आधुनिकतेच्या स्पर्धेमध्ये आपणही असायलाच हवे. जग पुढे जावे आणि आपण आहे तिथेच मागे राहावे हेही अयोग्य. आपण मागासलेले निश्चितच नसावे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग असायला हवा. यापासून दूर नसावे. परंतु भौतिक स्पर्धेच्या आधुनिक जगामध्ये जगत असताना त्याने आंतरिक अस्थिरता निर्माण न होऊ देण्याची कला अवगत असावी. ही कला म्हणजेच आंतरिक समाधानासाठी इच्छा परिमाण. आपण प्रगत असावे परंतु संस्कार सोडून नव्हे. आपण स्पर्धेत असावे परंतु आतून अस्थिर नसावे. धर्म,अर्थशास्त्र आणि नैतिकता यांचे स्वतःचे विषय क्षेत्र आणि नियम सत्य आहेत. असे असताना मात्र जीवन जगण्याचा उद्देश आणि दृष्टीकोण काय असावा हे आपण आपल्या परिस्थितीने निवडायचे असते. आणि म्हणून या ठिकाणी संस्कार आणि संतुलित जीवनशैली अत्यंत महत्त्वाची बनते. धर्मगुरू आणि सामाजिक मार्गदर्शकांनी यासाठीच इच्छा परिमाण , संतोष वृत्ती, संग्रहाची सीमा , इच्छा नियंत्रण , नियम, संयम , जीवनशैलीतील पवित्रता, यां बाबीं चा संस्कार दृष्टीने आचरणात समावेश केला आहे. म्हणूनच मला वाटते, हा संतोष वृत्तीचा विचार आणि केवळ अनिवार्य आवश्यकता केंद्रस्थानी ठेवून जगलेले जीवन निश्चितच समाधानाचे असेल.
(बलराज संघई, 9420015108 / वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम





















Subscribe to my channel




