जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या काही इच्छा,अपेक्षा आणि आकांक्षा असतात. इच्छा रहित जगण्याची कल्पना कोणताही मनुष्य करू शकत नाही. जगत असताना इच्छा आणि अपेक्षा काय आहेत हे प्रत्येकाच्या आपल्या जीवनशैलीवर आणि जीवन जगण्याच्या उद्देशावर अवलंबून असते. इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा या प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडण आणि संस्कारावर अवलंबून असतात. मनुष्य हा अपूर्ण आहे. संसारात आहे म्हणजे कोणी ही अद्याप पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. अपूर्ण या अर्थाने की तो अपेक्षेच्या परिघामध्ये आहे. मनुष्याला शरीर आहे, म्हणून खाण्या-पिण्याच्या अपेक्षा आहेत. त्याला वाणी किंवा भाषा आहे म्हणून इतर व्यक्तिमत्व आणि समाजाची अपेक्षा आहे. त्याला मन आहे म्हणून मान-सन्मान, इच्छा, प्रतिष्ठा इत्यादी अपेक्षा असतात. माणूस एक असतो परंतु अपेक्षा हजारो असतात. आणि त्या सर्व अपेक्षा बाह्य जगता मधून पूर्ण होत असतात. बाह्य जगातून तो ग्रहण करतो आणि अंतर्मन भरतो. म्हणूनच त्याच्या व्यक्तिगत सीमा सामाजिक बनतात. सामाजिक संवेदनामध्ये वैयक्तिक नैतिक आचरणाची अपेक्षा असते. त्यामध्ये हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह, संग्रह याचा निषेध स्वाभाविकपणे येतोच. परंतु समाजामध्ये जगत असताना माणसाच्या व्यक्तिगत अतिरिक्त इच्छा,अपेक्षा,आकांक्षा मात्र त्याला संघर्षाकडे नेतात. आणि या कारणानेच समाजामध्ये अशांतता आणि परस्पर राग द्वेष निर्माण होतात. आध्यात्मिक आणि नैतिक नियमांनी व्यक्तीचा विकास अशा पद्धतीने अपेक्षित केला की जो बाह्य जगातून निरपेक्ष होऊन स्वतःमध्ये संतुष्ट आणि तृप्त अशा प्रकारचे जीवन जगणारा असावा. समाजामध्ये सर्वांचे संतुलित आचरण आणि स्थिरतेच्या अपेक्षेने प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक पातळीवर संयम, संतोष आणि संग्रह प्रमाण गृहीत आहे. जगणे, उपजीविका, इच्छा आणि समाधान याला एक नैतिकतेचा परीघ आहे, धार्मिकतेची किनार आहे. त्याच बरोबर अर्थशास्त्राचा दृष्टिकोन देखील आहे हे सत्य नाकारता येणार नाही.अर्थशास्त्राच्या दृष्टीने अनिवार्यता पेक्षा आवश्यकतेचे क्षेत्र मोठे असते. इच्छेचे क्षेत्र आवश्यकतेपेक्षा मोठे असते. सर्व इच्छा ह्या आवश्यकता असतातच असे नव्हे. काही इच्छा या आवश्यकतेपेक्षा अधिक, जास्त आणि मोठ्या ही असू शकतात. जगण्याच्या साधारण आवश्यकता आणि उत्पन्न इच्छा यांचे प्रमाण संतुलन हे प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर आणि संस्कारावर अवलंबून आहे हेही खरे. मनुष्य ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये जगत असताना त्याच्या उद्देशाच्या केंद्रामध्ये संतोष समाधान आहे की इच्छा आकांक्षांची पूर्तता यावर त्याच्या जीवनातील मानसिक स्थिरता अवलंबून असते. इच्छा असणे हे स्वाभाविक नैसर्गिक आहे. मनुष्याच्या आवश्यकता या भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रितीरिवाज, शारीरिक अपेक्षा, स्पर्धा, आंतरिक भावनांची पूर्तता यावर अवलंबून असतात. समाधान आणि संतोष वृत्तीने जीवन जगण्यासाठी मनुष्याला सामाजिक आर्थिक परिस्थितीशी झगडावे लागते. तो संघर्ष किती हे त्याच्या आणि आकांक्षावर अवलंबून असते. त्या इच्छा आवश्यक अनिवार्य किती आहेत आणि भौतिक अनावश्यक किती आहेत यावर जगण्यातील संघर्षाचे प्रमाण निर्धारित होते. जगणं, इच्छा आणि आवश्यकतांची पूर्तता यामध्ये अर्थशास्त्र आणि आर्थिक परिस्थिती ही अत्यंत महत्त्वाची बनते. कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीच्या आवश्यकता सीमित असतात. कदाचित त्याच्या परिस्थितीमुळे त्या दमित झालेल्या असू शकतात. तो फक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक काय आहे त्याच्या पूर्ततेकडे लक्ष देऊन कार्यरत असतो. याउलट आर्थिक सुबत्ता, सुदृढता असणाऱ्या व्यक्तींच्या अतिरिक्त आवश्यकता याच अनिवार्यता बनलेल्या असतात. म्हणून तो केवळ जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता न करता त्यामध्ये विलासितायुक्त जीवनशैलीला पूर्ण करण्याच्या मागे लागलेला असतो. धर्माने प्रभावित असलेल्या व्यक्तीच्या आवश्यकता नैतिक दृष्टीने जीवनशैलीत परिवर्तित होतात. ज्या नैतिक आणि धार्मिक आदर्श यांना तो मानत असतो त्या मान्यतेनुसार त्याच्या आवश्यकता निर्माण होतात. म्हणूनच अशा व्यक्तीच्या आवश्यकता संतुलित असतात आणि जीवनामध्ये संतोष वृत्ती आणि समाधाना असते. जीवन जगत असताना कमीत कमी अनिवार्यता आणि इच्छाआधारीत आवश्यकता यानुसार मनात सतत एक द्वंद्वात्मक संघर्ष असतो. इच्छा आकांक्षांचा खड्डा इतका खोल आणि मोठा असतो की तो कधीही भरला जाऊ शकत नाही. या सत्याची स्वीकृती धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्हींनी केलेली आहे. अतिरिक्त आवश्यकता किंवा लोभ, मोह, स्पर्धा,अनियंत्रित भावना यांनी मनातील आर्तता वाढत जाते, ही आर्तता पुढे अशांती आणि रौद्रते मध्ये परिवर्तित होते. आणि अशांतता, अनैतिकता आणि हिंसेकडे वळते. अतिरिक्त इच्छा आकांक्षांची पूर्तता येण केण प्रकारेण पूर्ण करण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करावा लागतो. आणि त्यातच जीवन जगण्यासाठी जी स्थिरता आणि समाधान हवे असते ते लोप पावते. अशा प्रकारचे जगणे सतत आंतरिक शल्याचे आणि असंतुलित, अस्थिर असे होऊन जाते. विद्यमान जगामध्ये जगत असताना आपण मागे नसावे. आधुनिकतेच्या स्पर्धेमध्ये आपणही असायलाच हवे. जग पुढे जावे आणि आपण आहे तिथेच मागे राहावे हेही अयोग्य. आपण मागासलेले निश्चितच नसावे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग असायला हवा. यापासून दूर नसावे. परंतु भौतिक स्पर्धेच्या आधुनिक जगामध्ये जगत असताना त्याने आंतरिक अस्थिरता निर्माण न होऊ देण्याची कला अवगत असावी. ही कला म्हणजेच आंतरिक समाधानासाठी इच्छा परिमाण. आपण प्रगत असावे परंतु संस्कार सोडून नव्हे. आपण स्पर्धेत असावे परंतु आतून अस्थिर नसावे. धर्म,अर्थशास्त्र आणि नैतिकता यांचे स्वतःचे विषय क्षेत्र आणि नियम सत्य आहेत. असे असताना मात्र जीवन जगण्याचा उद्देश आणि दृष्टीकोण काय असावा हे आपण आपल्या परिस्थितीने निवडायचे असते. आणि म्हणून या ठिकाणी संस्कार आणि संतुलित जीवनशैली अत्यंत महत्त्वाची बनते. धर्मगुरू आणि सामाजिक मार्गदर्शकांनी यासाठीच इच्छा परिमाण , संतोष वृत्ती, संग्रहाची सीमा , इच्छा नियंत्रण , नियम, संयम , जीवनशैलीतील पवित्रता, यां बाबीं चा संस्कार दृष्टीने आचरणात समावेश केला आहे. म्हणूनच मला वाटते, हा संतोष वृत्तीचा विचार आणि केवळ अनिवार्य आवश्यकता केंद्रस्थानी ठेवून जगलेले जीवन निश्चितच समाधानाचे असेल.
(बलराज संघई, 9420015108 / वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- पुण्यात खळबळ! चिंचवडच्या जत्रेत थेट 'Made in Pakistan' चादरींची विक्री? धुलाईनंतर गुपित उघड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- पुण्यात खळबळ! चिंचवडच्या जत्रेत थेट 'Made in Pakistan' चादरींची विक्री? धुलाईनंतर गुपित उघड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
गुन्हा
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
राजकीय
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
























Subscribe to my channel



