आयपीएलच्या 15 व्या हंगामात सर्वाधिक लक्ष हे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे असणार आहे. त्याने गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरची ही त्याची पहिलीचआयपीएल असणार आहे. त्याच्या डोक्यावरचा कॅप्टन्सीचा काटेरी मुकूट आता उतरला असल्याने तो फलंदाजीत आपल्या जुन्या लयीत परतण्याची अपेक्षा चाहते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ ड्युप्लेसिस हा विराट कोहलीचा उत्तराधिकारी असणार आहे. दरम्यान, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने विराट कोहली पुढच्या वर्षी पुन्हा आरसीबीचा कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा अनेक वर्ष महत्वाचा भाग असलेल्या फाफ ड्युप्लेसिसला आरसीबीने यंदाच्या लिलावात 7 कोटी रूपयाला खरेदी केले. याचबरोबर त्यांनी त्याला आपल्या संघाचे कर्णधार देखील केले. मात्र आरसीबीच्या या निर्णयावर काही लोकांनी शंकाही उपस्थित केली. कारण फाफ ड्युप्लेसिस हा 37 वर्षांचा खेळाडू आहे. त्याचा सध्या तरी फिटनेस तगडा असला तरी तो फार काळ आरसीबीसाठी उपयुक्त ठरेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आरसीबीसाठी तो दीर्घ काळचा कर्णधार होणे शक्य नाही.
दरम्यान, यंदाचा आयपीएल हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्याआर अश्विनने याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'त्याला कर्णधार करण्याचा चांगला निर्णय आरसीबीने घेतला. त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. तसेच त्याच्या नेतृत्वावर धोनीची छाप देखील पहावयास मिळेल.फाफ ड्युप्लेसिसची आयपीएल कारकिर्द ही उतरणीला लागली आहे. तो अजून दोन ते तीन वर्षे खेळू शकतो. '
अश्विन पुढे म्हणाला की, 'मला असे जाणवते की विराट कोहलीवर गेल्या काही वर्षापासून कॅप्टन्सीचा चांगलाच ताण होता. या वर्षी तो कॅप्टन्सीमधून ब्रेक घेईल. माझा असा अंदाज आहे की आरसीबी त्याला पुढच्या वर्षी पुन्हा कर्णधार करेल.' विराट हा आरसीबीचा 2013 पासून कर्णधार आहे हे अश्विनने अधोरेखित केले. विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार असताना फलंदाज म्हणून खोऱ्याने धावा केल्या. मात्र त्याला आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. आता आरसीबी या हंगामात कशी कामगिरी करते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




