अंबरनाथमध्ये उपचारादरम्यान एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झालेल्या डॉ. स्वप्नाली गायकर यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक छळामुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप डॉक्टर गायकर यांनी केला आहे. सध्या त्यांच्यावर उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकी घटना काय?
अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या विजय विनोद जयस्वाल या ६ वर्षीय मुलाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता. डॉ. स्वप्नाली गायकर या त्याच्यावर उपचार करत होत्या. ७ फेब्रुवारी रोजी उपचारांदरम्यान त्या मुलाला सलाईन लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिथे त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुलाच्या पालकांनी डॉ. गायकर यांच्यावर चुकीच्या उपचारांचा आणि हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला.
डॉक्टरांचा आरोप काय?
डॉ. स्वप्नाली गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल (PM Report) येणे अद्याप बाकी आहे. असे असतानाही प्रवीण गोसावी, संदीप भरड, वैशाली नलावडे आणि मिलिंद मगर या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणतीही अधिकृत तक्रार नसताना त्यांना टार्गेट केले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आणि सातत्याने मानसिक दडपण आणून बदनामी केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. याप्रकरणी कायदेशीर मार्गाने तपास व्हावा, पण अशा प्रकारे विनाकारण बदनामी करून मला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे, असे डॉ. स्वप्नाली गायकर यांनी म्हटले.
तर दुसरीकडे, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून आपल्या चुकीच्या कामावर पडदा टाकण्यासाठी डॉक्टर ड्रामा करत आहेत, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असून आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या सर्व प्रकरणाची अंबरनाथ पोलीस चौकशी करत आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
[embedded content]
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




