AUS vs IND : टीम इंडिया टी 20I सीरिजसाठी सज्ज, रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार, सामना किती वाजता?

वर्ल्ड चॅम्पियन्स वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India Women Team Tour Of Australia 2026) दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात रविवार 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. उभयसंघात 15 फेब्रुवारीपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील पहिला टी 20i सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना रविवारी 15 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला टी 20I सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर दोन्ही संघ आमनेसामने

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांची या मालिकेनिमित्ताने आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं या टी 20I मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर सोफी मोलिनेक्स हीच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ

दरम्यान आतापर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 35 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियावर वरचढ असल्याचं आकड्यांतून स्पष्ट होतं. ऑस्ट्रेलियाने 35 पैकी 26 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भारताला केवळ 7 सामनेच जिंकता आले आहेत. उभयसंघातील 1 सामना बरोबरीत राहिला. तर एका सामन्याचा निकाला लागला नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *