संजय कुमार यांचा कॉलम:राजकारणात पोटनिवडणुकांचा ‎कल आता नेमका कशाकडे?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतात विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ रिक्त‎झाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस सहा‎महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यास‎पोटनिवडणूक घेतली जाते. सध्या बिहारमधील‎बांकीपूर, मध्य प्रदेशातील दतिया आणि गुजरातमधील‎मंझलपूर या तीन विधानसभा मतदारसंघांत‎पोटनिवडणुका प्रस्तावित आहेत. यापैकी मंझलपूरकडे‎तुलनेने कमी लक्ष असले, तरी दतिया आणि बांकीपूर या‎दोन मतदारसंघांतील राजकीय घडामोडींनी विशेष चर्चा ‎‎रंगवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व ‎‎कायम असल्याने ही उत्सुकता निकालानंतर‎अल्पकालीन ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.‎ आकडेवारीही यालाच दुजोरा देते.‎ गेल्या पाच वर्षांत विविध राज्यांतील 153 विधानसभा ‎‎पोटनिवडणुकांपैकी 119 जागांवर सत्ताधारी पक्ष किंवा ‎‎आघाडीने विजय मिळवला.‎ म्हणजेच त्यांचा यशाचा दर 78 टक्के राहिला. विरोधी‎पक्ष किंवा आघाड्यांना केवळ 34 जागा मिळाल्या. ‎‎म्हणजेच त्यांचा यशाचा दर 22 टक्के राहिला. गेल्या पाच‎वर्षांपासून हा कल कायम आहे.‎ सध्याच्या पोटनिवडणुकांपूर्वी 2026 मध्ये सात जागांवर‎पोटनिवडणुका झाल्या होत्या. सर्व जागांवर सत्ताधारी‎पक्ष किंवा आघाडी विजयी झाली होती. 2025 मध्ये 15‎जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांपैकी 9 जागा‎सत्ताधारी पक्षाने तर 6 जागा विरोधकांनी जिंकल्या.‎2024 मध्ये 86 जागांवरील पोटनिवडणुकांत 69 जागा‎सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीने जिंकल्या तर‎विरोधकांना 17 जागांवर समाधान मानावे लागले.‎ 2023 मध्ये 17 पैकी 12 जागांवर सत्ताधारी पक्ष विजयी‎झाला, तर विरोधकांना 5 जागा मिळाल्या. 2022 मध्ये‎28 पैकी 22 जागा सत्ताधारी पक्षाने जिंकल्या, तर‎विरोधकांना केवळ 6 जागा मिळाल्या.‎ दतिया आणि बांकीपूर येथील पोटनिवडणुकांनी विशेष‎राजकीय उत्सुकता निर्माण केली आहे. भाजपने‎बांकीपूरमध्ये उमेदवार बदलला तर मध्य प्रदेशचे माजी‎गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतियातून उमेदवारी‎नाकारण्यात आल्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी नाराजी‎व्यक्त केली. मिश्रा हे राज्यातील प्रभावी नेते मानले जात‎असतानाही पक्षाने त्यांच्या ऐवजी आशुतोष तिवारी यांना‎उमेदवारी दिली.‎ बांकीपूरमध्ये भाजपने सुरुवातीला अभिषेक कुमार सिन्हा‎यांना उमेदवार घोषित केले होते. मात्र त्यांनी कौटुंबिक‎कारणास्तव निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर‎पक्षाने नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली. बांकीपूर‎मतदारसंघ आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे.‎ जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांचा हा पहिलाच‎निवडणूक सामना आहे. 2025 मधील बिहार विधानसभा‎निवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रथमच प्रवेश केला होता.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मात्र, त्या वेळी प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढले‎नव्हते. पक्षाला केवळ 3.5 टक्के मते मिळाली होती‎आणि एकही जागा जिंकता आली नव्हती.‎ दतिया आणि बांकीपूर या मतदारसंघांची चर्चा‎विरोधकांनी बलाढ्य उमेदवार दिल्यामुळे किंवा अत्यंत‎चुरशीची लढत होणार असल्यामुळे नाही.‎ या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीची चर्चेमागे इतर‎राजकीय कारणे आहेत. भाजपमध्ये काही प्रमाणात‎अंतर्गत अस्वस्थता आणि हालचाली सुरू असल्याचे‎चित्र दिसत आहे. सामान्यपणे भाजपच्या बाबतीत अशी‎परिस्थिती दुर्मिळ मानली जाते.‎ भाजपमध्ये अशा प्रकारचे चित्र दिसत नाही. परंतु‎पोटनिवडणुकीत ते समोर येत आहे. त्यामुळेच या दोन्ही‎पोटनिवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष‎लागले आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ गेल्या पाच वर्षांत देशभरात झालेल्या 153‎विधानसभा पोटनिवडणुकांमधून एक‎स्पष्ट कल समोर आला आहे. सरासरी‎भारतीय मतदार उमेदवारापेक्षा पक्षाला‎प्राधान्य देऊन मतदान करतो. लहान‎राज्यांत उमेदवाराची वैयक्तिक‎लोकप्रियता महत्त्वाची ठरू शकते.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *