ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

ठाणे: विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्याच सुनेने, गिरीजा राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीतील मुख्य मुद्दे: शारीरिक व मानसिक छळ गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा पती गितेश राऊत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असमर्थ असल्याचे माहीत असूनही विनायक राऊत आणि सासू शामल राऊत यांनी तिचे लग्न लावून दिले.

अघोरी कृत्य आणि जादूटोणा: तक्रारीनुसार, गिरीजा यांच्यावर 'बाहेरची बाधा' झाल्याचे कारण पुढे करून त्यांना बळजबरीने गोमूत्र पिण्यास भाग पाडले गेले. तसेच, डोक्यावरील केस कापणे, अंगावरून जिवंत कोंबडी उतरवणे यांसारखे अमानुष प्रकार करण्यात आले.

बुवा-बाबांचा सहभाग: या अघोरी कृत्यांसाठी 'फिरोज बाबा' आणि 'काजी बाबा' नावाच्या संशयित व्यक्तींची मदत घेतल्याचा आरोप असून, या दोघांवरही एफआयआरमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

आर्थिक मागणी: गिरीजा यांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर गेल्या सात वर्षांपासून त्यांचा सतत मानसिक, भावनिक आणि आर्थिक छळ केला जात होता.

विनायक राऊतांची प्रतिक्रिया: विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "ही घटना २०१८ ते २०२२ मधील असल्याचे सांगितले जाते, मग तक्रार आता २०२६ मध्ये का केली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ज्या बाबांकडे जाण्याबाबत तक्रार केली आहे, तिथे गिरीजांचे आई-वडीलही सोबत होते, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *