Why Did Sanjay Dutt Leave 'Welcome To The Jungle'? Director Ahmed Khan Finally Reveals the Real Reason!

'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!

Why Did Sanjay Dutt Leave 'Welcome To The Jungle'? Director Ahmed Khan Finally Reveals the Real Reason!मुंबई: अक्षय कुमारचा बहुचर्चित 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ३४ कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटात संजय दत्तही दिसणार असल्याची मोठी चर्चा होती. मात्र, शूटिंग सुरू करूनही संजय दत्त अचानक या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर, चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी यावर मौन सोडले असून संजय दत्तच्या बाहेर पडण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे.

 

दिग्दर्शकाचा खुलासा: अहमद खान यांनी सांगितले की, संजय दत्तला चित्रपटाची स्क्रिप्ट प्रचंड आवडली होती आणि आपल्या जवळच्या मित्रांसोबत (अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ) काम करण्यासाठी तो खूप उत्साही होता. खुद्द संजय दत्तने चित्रपटातील काही सीन्सचे शूटिंगही पूर्ण केले होते. मात्र, त्याला उपचारांसाठी अमेरिकेला जाणे अनिवार्य होते, ज्यामुळे तारखांचे (Dates) मोठे गणित बिघडले. चित्रपटात ३० पेक्षा जास्त कलाकार असल्याने प्रत्येकाच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नव्हते, त्यामुळे संजय दत्तला या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले.

संजय दत्तने केली मदत: चित्रपट सोडल्यानंतरही संजय दत्तने निर्मात्यांची मोठी मदत केली. अहमद खान यांच्या मते, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांना या भूमिकेसाठी तयार करण्यात संजय दत्तचा मोलाचा वाटा होता. त्याने स्वतः सुनील शेट्टीला फोन करून या भूमिकेसाठी प्रोत्साहित केले, ज्याबद्दल संपूर्ण टीम त्याची आभारी आहे.



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *