राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील रिक्त पदांची कोंडी फोडण्यासाठी तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील ५,५०० प्राध्यापक पदांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आचारसंहितेचा अडथळा दूर होताच या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्राध्यापक भरतीला नवसंजीवनी
राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. नवी मुंबईतील पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर महत्त्वपूर्ण घोषणा केली. सध्या राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुमारे ११,००० प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ५,५०० पदे भरण्यास राज्य सरकारने रीतसर मंजुरी दिली आहे.
केवळ संलग्न महाविद्यालयेच नव्हे, तर विद्यापीठांच्या मुख्य कॅम्पसमध्ये रखडलेली ७०० प्राध्यापकांची भरती देखील केली जाणार आहे. या निर्णयामुळे SET, NET आणि Ph.D. धारक तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
७० हजार पदांची प्रशासकीय महाभरती
प्रशासकीय कामाचा वेग आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७० हजार पदे भरण्याचा संकल्प केला आहे. या मेगाभरतीतील २०,००० पदे ही केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार आहेत. यात राजपत्रित आणि अराजपत्रित अशा दोन्ही श्रेणींचा समावेश असेल. यामध्ये गृह विभाग (पोलीस भरती), महसूल (तलाठी, लिपिक), आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी नियमावलीत आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान आचारसंहितेमुळे अनेक भरती प्रक्रिया तात्पुरत्या थांबलेल्या होत्या, मात्र आता त्या जलद गतीने राबवल्या जातील, अशी माहिती आता समोर येत आहे. येत्या काही आठवड्यांत विविध विभागांच्या अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
[embedded content]
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




