Vijay’s TVK Emerges as Single Largest Party, Reshaping State Politics!

तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!

Vijay’s TVK Emerges as Single Largest Party, Reshaping State Politics!चेन्नई | तमिळनाडूच्या राजकीय पटलावर आजवर अनेक सिनेसतारे चमकले, पण सुपरस्टार थलपती विजय यांचा 'टीव्हीके' (TVK) पक्षाचा प्रवेश हा केवळ ग्लॅमरपुरता मर्यादित नसून तो प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. विजयाने अत्यंत शांतपणे आणि नियोजित पद्धतीने आपल्या 'फॅन क्लब'चे रूपांतर एका शिस्तबद्ध राजकीय संघटनेत केले असून, त्याचा थेट परिणाम राज्याच्या व्होट बँकेवर होताना दिसत आहे.

२० वर्षांची सामाजिक तपश्चर्या
विजयाचा हा विजय एका दिवसाच्या करिष्म्यावर आधारलेला नाही. गेल्या दोन दशकांपासून त्यांच्या 'फॅन क्लब'च्या माध्यमातून तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यात समाजकार्याचं भक्कम जाळं विणलं गेलं होतं. रक्तदान शिबिरं असोत की गरिबांना अन्न-वस्त्र पुरवणे, या कामांमुळे जनतेच्या मनात विजयाबद्दल 'आपला माणूस' ही भावना निर्माण झाली. विशेष म्हणजे, त्यांच्या फॅन क्लबची रचना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणेच आहे, जिथे राज्य, विभाग आणि बूथ स्तरावर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. २०२१ च्या स्थानिक निवडणुकांत त्यांच्या समर्थकांनी मिळवलेलं यश ही आगामी मोठ्या विजयाची नांदीच होती.

नवी व्होट बँक: अल्पसंख्याक आणि तरुणांचा आधार
विजयाने आपल्या राजकीय व्यासपीठावरून 'जोसेफ विजय' ही आपली ओळख ठळकपणे मांडत ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवून घेतले आहे. आजवर 'द्रमुक'चा (DMK) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या १२% मतदारांमध्ये विजयाने मोठी खिंडार पाडली आहे. सोबतच, 'फर्स्ट टाईम व्होटर्स' म्हणजेच तरुण पिढी आणि महिला मतदारांमध्ये विजयाची प्रचंड क्रेझ आहे. सुमारे २ कोटी तरुण आणि महिलांची मते थेट विजयाच्या पारड्यात पडत असल्याने प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत.

लोककल्याणकारी आश्वासनांचा 'मास्टरस्ट्रोक
विजयाने आपल्या जाहीरनाम्यातून सामान्य जनतेच्या गरजांना हात घातला आहे. महिलांसाठी दरमहा २५०० रुपये भत्ता, मुलींच्या लग्नासाठी ८ ग्रॅम सोनं, बेरोजगारांना ४००० रुपयांचा भत्ता आणि ५ लाख तरुणांसाठी इंटर्नशिप यांसारख्या योजनांमुळे मध्यम आणि गरीब वर्गात त्यांच्याबद्दल मोठी आशा निर्माण झाली आहे.

चित्रपट सोडण्याचा धाडसी निर्णय
एमजीआर (MGR) यांच्यानंतर चित्रपटसृष्टीच्या शिखरावर असताना, 'लिओ' आणि 'गोट' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे बाजूला सारून पूर्णवेळ राजकारणात उतरणारा विजय हा पहिलाच सुपरस्टार आहे. करिअरच्या शिखरावर असताना घेतलेला हा निर्णय त्यांच्या राजकीय

प्रामाणिकतेचा पुरावा मानला जात आहे.
थोडक्यात, केवळ पडद्यावरचा 'हिरो' न राहता, जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची तयारी केल्यामुळेच आज तमिळनाडूमध्ये 'थलपती' पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *