पुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच यंदाची उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
पुणे : पुणे शहरात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून मागील तीन दिवसांपासून सातत्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे.
लोहगाव येथे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडत असून कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडताना दोनदा विचार करत आहेत. सकाळी 10 नंतरच सूर्याचा चटका वाढू लागतो आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होते.
हवामान विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, या कालावधीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जर अत्यावश्यक कारण असेल तर छत्री, टोपी, गॉगल्स आणि पुरेसे पाणी सोबत ठेवावे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांच्या नोंदींमध्ये एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान 42 अंशांपेक्षा जास्त फक्त पाच वेळा गेले आहे. त्यामुळे यंदाची उष्णतेची लाट ही तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर मानली जात आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 18 एप्रिलपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पुण्यातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, 18 ते 19 एप्रिलनंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
सध्या पुणेकरांनी जास्तीत जास्त पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या वेळेत घरातच राहणे हेच सुरक्षित ठरेल. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या काळात नागरिकांना आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तसेच चार दिवसांनी म्हणजे 19 एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 19 एप्रिलला तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



