
Mumbai : राज्यात मागील काही महिन्यांपासून ज्या निवडणुकांची प्रतीक्षा होती त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आजपासून सदर जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच मजमोजणी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (ZP & Panchayat Samiti Election) १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छानणी २२ जानेवारी रोजी होईल आणि उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप- २७ जानेवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर होईल.
|
Pune Crime : मैत्रिणीच्या घरी मेजवानी, बोलता बोलता विषय भरकटला; कोंढव्यात थरारक घटना! |
दरम्यान, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या इतर २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर घेण्यात येणार आहेत.
राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या पुणेजिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीची तयारी करा, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवून आदेश दिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
- दुबार मतदार आम्ही निश्चित केले असून त्याबाबतची कार्यवाही अधिकारी करतील.
- मताधिकार मोबाईलअॅपद्वारे मतदाराला त्याला त्याचा निवडणूक विभाग, मतदान केंद्र शोधता येईल
- मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवरही त्याचं नाव टाकून त्याचे मतदान केंद्र शोधता येईल
- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर आणि तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रियांना मतदानावेळी प्राधान्य देण्यात येईल
- १२ जिल्हा परिषदांमधून ७३१ सदस्य निवडून दिले जातील
- १२५ पंचायत समित्यांमधून १ हजार ४६२ सदस्य निवडून दिले जातील
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकाअंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांना होती. दरम्यान, निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, राज्यातील २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर येत्या २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मुदतवाढ मागितली होती. त्यावर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. त्यानंतर आज ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असणारे १२ जिल्हे असून त्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि त्या अंतर्गत असणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदारांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका या निर्भय, मुक्त तसेच पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची सर्व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पर्यवेक्षक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel


https://shorturl.fm/y8m3D