Pune : अजित पवारांच्या शिलेदाराचा भाजपवर थेट आरोप; ईव्हीएम मशीनवरून खळबळ, राजकीय वातावरण तापलं

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपकडून “सव्वाशे पार”चा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक प्रत्युत्तर देत भाजपवर थेट ईव्हीएम हॅक संबंधी आरोप केला आहे. भाजपचे आमदार तथा प्रचार प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सव्वाशेहून अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. पक्षात बंडखोरी होणार नाही, निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उद्या (रविवारी) भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

या वक्तव्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जोरदार पलटवार केला. “भाजप ईव्हीएम सेट केल्याशिवाय सव्वाशे पार करू शकणार नाही. भाजपला १०० जागा मिळवणंही कठीण आहे. भाजपने सव्वाशे पार केल्यास मी राजकारण सोडेन,” असा थेट दावा बहल यांनी केला.

Pune : महापालिकेच्या मैदानात आंदेकर फॅमिलीची एन्ट्री; अर्ज भरताना बंडू आंदेकर भावुक, VIDEO व्हायरल

भाजप सध्या फोडाफोडीचं राजकारण करत असून पक्षात येणाऱ्या लोकांना ‘मशिनमधून आपोआप दोन ते अडीच हजार मते मिळतील’ असा विश्वास दिला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, तेच भाजपमध्ये गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येईल,” असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला.

एकूणच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगण्याची चिन्हं असून, आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का? याबाबत अद्याप अनिश्चितताच कायम आहे.

"आता त्यांनी ईव्हीएम सेट केलंय का? हे त्यांनाच माहिती. पण ते 125 जागा पार करणार म्हणतात. माझं त्यांना आताच आव्हान आहे. त्यांनी 125 जागा पार केल्या तर कायमचं राजकारण सोडून टाकू. 125 काय 100 जागा मिळवणंही त्यांना अवघड जाईल. एवढं सोपं काम थोडी आहे. निकालच दाखवले आणि जनता दाखवेल काय होणार आहे. वास्तविक पाहता ते फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. त्यामध्ये ते लोकांना असं सांगत आहेत की, मशीनमध्ये दोन-अडीच हजार मते आपोआप मिळतील, बाकीची सगळी मदत करु, तुम्ही आमच्याकडे या. असं सगळं सुरु आहे", असा धक्कादायक दावा योगेश बहल यांनी केला.

"जी लोकं आम्हाला सोडून गेली आहेत त्यांना स्वत:वर विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की, आपण राष्ट्रवादीकडून निवडून येऊ शकत नाही. अजित दादा यांच्यासारखा उमदा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून पळून जावून काय साध्य करणार? जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही", असा पलटवार योगेश बहल यांनी भाजपवर केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *