Mumbai–Pune Expressway Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकचे ब्रेक निकामी, चालकाचा जागीच मृत्यू

Raigad : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा एक ट्रक अचानक ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलमला धडकला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. पुणे बाजूकडून मुंबईकडे सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ४५/५०० जवळ, अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खांबाला जोरदार धडकला.

Mumbai : राज्याच्या राजकारणात खळबळ! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा

या धडकेमुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले. दुर्दैवाने, या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अपघातानंतर घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले होते. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच आय.आर.बी.ची आपत्कालीन टीम, वाहतूक पोलीस, अपघातग्रस्त मदत पथक आणि काही सामाजिक कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित कार्यवाही करत अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला हटवला.

अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. मात्र, या अपघाताने पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, वाहनांची नियमित तपासणी करावी आणि प्रशासनानेही कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

एक्सप्रेस वेवर वारंवार होणारे अपघात हे वेगमर्यादा, वाहनांची देखभाल आणि चालकांचा निष्काळजीपणा या कारणांमुळे वाढत असल्याचे समोर येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *