Mumbai : मोठी बातमी: वरळीत म्हाडाचे ८५ आणि ५८ मजली गगनचुंबी प्रकल्प; मुंबईकरांना परवडणारी घरे उपलब्ध होणार

Mumbai : मुंबईत स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या मुंबईतील घरांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मुंबईतील जमीनींना सोन्याचे मोल मिळाले आहेत. त्यामुळे घर खरेदी करावे की नाही? असा मोठा प्रश्न सामान्यांच्या समोर उभा आहे. सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कायम सज्ज असते. म्हाडाकडून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान, सामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी काळात दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात म्हाडाकडून घरं दिली जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडानं वरळीतील बीडीडी चाळीच्या परिसरात ५८ तसेच ८५ मजली असे २ टॉवर्स उभारण्याची मोठी योजना आखली आहे. या इमारती पूर्ण झाल्यावर लॉटरी प्रक्रियेद्वारे अलिशान घरात राहण्याची संधी सामान्य नागरिकांना मिळेल. या इमारतींमध्ये सामान्यांना पंचतारांकित सुविधा देखील मिळणार आहेत.

Chennai : भीषण अपघात: दोन बसांची समोरासमोर धडक; हृदयद्रावक घटना 6 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

प्राथमिक माहितीनुसार, वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाकडून नव्या इमारतींचं बांधकाम सुरूये. मिळालेल्या माहितीनुसार, या पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाला स्वत: विकास करण्याची स्वतंत्र भूखंड उपलब्ध होणार आहे. याच जागेवर म्हाडाकडून ५८ आणि ८५ मजली टॉवर्स उभारण्यात येणार आहे. अशी योजना म्हाडाने आखली आहे.

म्हाडाकडून दोन्ही टॉवर्स उभारल्यानंतर, नेहमीप्रमाणे लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करणार आहे. या नवीन इमारतींमध्ये आधुनिक आणि अलिशान सुविधांची सोय देखील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *