Maharashtra News : 'कंटाळा आल्याने आईला संपवलं', लेकाकडून हादरवणारं कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

Maharashtra News : आई - मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानं त्याच्या आईची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्यानं स्वत: पोलिसांशी संपर्क साधला आणि हत्या करण्यामागचं कारण सांगितलं. 'कंटाळा आला होता, म्हणून आईची हत्या केली', असं नराधम मुलानं आईची हत्या करण्यामागचं कारण सांगितलं. या घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिकांना धक्का बसला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


ही संतापजनक घटना नाशिकमधील शिवाजीनगर परिसरातून उघडकीस आली आहे. अरविंद मुरलीधर पाटील असे आरोपीचे नाव आहे. तर, यशोदाबाई पाटील (वय वर्ष ८०)असे वृद्ध महिलेचं नाव आहे. घटनेच्या दिवशी मुलानं आईचा गळा दाबून खून केला. नंतर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.


यानंतर पोलिसांनी पाटील याच्या घराची झडती घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. नंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. 'कंटाळा आला होता, म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबून खून केला. मला अटक करा', असं म्हणत आरोपी मुलानं गुन्हा कबूल केला.

नाशिक रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे मानसिक रूग्ण असल्याची माहिती आहे. अरविंद विवाहित असून, त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *