
Pune : भारतात अमेरिकतील ॲपल कंपनीच्या आयफोन-१७ चे जल्लोषात स्वागत होत आहे. अनेक शहरांमध्ये आयफोनच्या खरेदीसाठी ॲपलच्या दालनांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत तर या रांगेत मारामारी होण्याची वेळ आली. अमेरिकी उत्पादनांसाठी अशा प्रकारे लाल गालिचा अंथरला जातो, कोट्यवधी रुपयांची विक्री होते. परंतु ज्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आपल्या ज्ञानाचा आणि मेहनतीचा खरा हातभार लावला आहे, त्यांनाच एच-१ बी व्हिसाच्या ट्रम्पकालीन अन्यायी धोरणांमुळे फटका बसत आहे. यावरून फोरम फोर आयटी एम्प्लॉईजने भारत सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे.
भारताचा सर्वांत मोठी निर्यात ही मानवी बुद्धिमत्ता आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातून ही सर्वाधिक आहे. हीच मानवी बुद्धिमता अमेरिकेला अब्जावधी डॉलरचे उत्पन्न मिळवून देते. तरीही अमेरिकेत भारतीय आयटी कर्मचाऱ्यांवर बंधने, नवे शुल्क आणि अस्थिर धोरणे लादली जात आहेत. याचवेळी अमेरिकी कंपन्यांची उत्पादने भारतात निर्बंधाशिवाय, थेट प्रवेश करतात. ही विसंगती संतापजनक आहे, असे आयटी फोरमने म्हटले आहे.
नव्या नियमांनुसार एच-१ बी व्हिसावर १ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ८८ लाख रुपय शुल्क लावण्याचा निर्णय म्हणजे थेट भारतीयांवर आर्थिक गंडांतर आहे. सध्या सुटीसाठी भारतात आलेले किंवा येण्याचे नियोजन करणारे कर्मचारी या निर्णयाने अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना भेटणे किंवा वैद्यकीय कारणांसाठी भारतात येणे हेही त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे आयटी फोरमने स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये अमेरिकन उत्पादनांना बाजारपेठ खुली करून देताना, भारतीय मानवी संपदेला न्याय मिळेल याची खात्री भारतीय सरकारने करून द्यायला हवी. आपली ताकद म्हणजे प्रतिभा, आणि तीच जर अन्यायकारक धोरणांनी गुदमरली, तर हा देश फक्त आयफोन विकत घेणारा बाजार राहील; जागतिक ज्ञानशक्ती म्हणून ओळखला जाणार नाही, अशी टीका तज्ज्ञांकडून होत आहे.
या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर व कामगार मंत्रालयाने अमेरिकेकडे कठोरपणे बाजू मांडावी. भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना वाचवणे ही केवळ उद्योगाची नव्हे, तर राष्ट्रीय प्राधान्यक्रमाची बाब असणे आवश्यक आहे, असेही आयटी फोरमने नमूद केले आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

