Wasmat Bajar Samiti : हळद विक्रीचे दोन महिने उलटूनही पैसे मिळेना; शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने बाजार समिती बंद

Hingoli : शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळणे अपेक्षित असते. मात्र हिंगोलीच्या वसमत बाजार समितीमध्ये हळद विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी रक्कम मिळत नसल्याने बाजार समितीतील खरेदी विक्री बंद ठेवण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. याला साधारण दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तर या शेतकऱ्यांना अडत व्यापाऱ्याकडून पैसे मिळत नसल्याने हळद विक्री केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. बाजार समिती मार्फत अडत व्यापाऱ्यांकडून खरेदीदारांनी मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या ६० दिवसांपासून पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे रोखल्याचे आडत व्यापारी सांगत आहेत.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! ओव्हरटेक करताना टँकरची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

१९ जुलैपासून मालाची खरेदी बंद

दरम्यान या सगळ्या आर्थिक अडचणीमुळे अडत व्यापाऱ्यांनी १९ तारखेपासून आपली दुकाने बंद ठेवली असून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी बंद करण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकाराकडे मात्र वसमतमधील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे देखील पाहायला मिळालं आहे. काबाड कष्ट करून उत्पादन केलेल्या मालाचे पैसे मिळण्यास उशीर होण्याला नेमके जबाबदार कोण? असा सवाल करत वसमत मधील अनेक शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

व्यवहार ठप्प

दरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची खरेदी केली जात असते. मात्र १९ जुलैपासून बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे मागील सहा दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले आहेत. तर माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आपला माल परत घेऊन जावे लागत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *