
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात भर दिवसा २० जणांचे टोळक्याने तीन जणांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर किराणा मालाचे दुकान पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली होती. त्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यानंतर थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण करून त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पकडले नाही, तोच पुन्हा आज अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या निंबळक परिसरात २० जणांच्या टोळक्याने एक किराणा मालाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात नेमकं चाललय काय? कायदा सुव्यवस्था कोणाच्या भरोशावर आहे असा प्रश्न समोर येत आहे.
|
|
टोळक्याची हिंमत वाढली
निंबळक बायपास चौकात संदीप कोतकर, विलास कोतकर, राजू कोतकर, दत्तु कोतकर यांच्यावर अनोळखी टोळीकडून अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्यात तीनही बंधू जखमी झाले असून टोळक्याची हिम्मत एवढी की त्यांनी कोतकर यांचे किराणा दुकान जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला आहे. सदरची घटना ज्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली त्या पोलीस स्टेशन कारभाराबद्दल नुकतेच परिसरातील उद्योजकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून एमआयडीसीमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
आमदार संग्राम जगताप यांनीही याबाबत आवाज उठवला, तरीही एमआयडीसी पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे भर दिवसा टोळक्याने येऊन अमानुष हल्ला करत तीन जणांना गंभीर जखमी केले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




