
Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार स्थापन होणेआवश्यक आहे; परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते. बहुतेक एक्झिट पोल्सने महायुतीला बहुमत दिले असले, तरी त्यांना किंवा मविआला निर्णायक आघाडी न मिळाल्यास राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता येतो.
विधानसभेच्या निकालानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे. २६ तारखेला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपणार आहे. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे.
कोणत्याही आघाडी वा युतीला निर्णायक बहुमत न मिळाल्यास कायदेतज्ज्ञांच्या मते सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण द्यावे लागेल. हा पक्ष कोणता असेल, त्यावर आगामी राजकारणाची वाटचाल ठरू शकेल, असेही सांगितले जात आहे. पुन्हा एकदा सत्तांतराचा प्रयोग महाराष्ट्रात होतो, की सरकारस्थापनेची प्रक्रिया ठप्प पडते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनीही आज सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राजकीय पक्षांच्या पुढील हालचाली कशा असतील, त्याबद्दल येत्या दोन दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल. विद्यमान व्यवस्थेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही निवडणूकपूर्व आघाड्या असल्यामुळे यातील कोणत्याही बाजूला निर्णायक बहुमत मिळाल्यास परिस्थिती सोपी होईल.
बहुमताचा १४५चा आकडा कोणालाही गाठता न आल्यास मात्र कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या नव्या सदस्यांचे अधिवेशन राज्यपाल बोलावतात; मात्र यासंबंधीचा निर्णय राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर घेतात. त्यासाठी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने म्हणजेच मुख्यमंत्री कोण हे ठरवणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगतात. प्रत्यक्षात दोन दिवसांत मुख्यमंत्री ठरू शकला नाही तर विधानसभेचा कालावधी संपला, हे लक्षात घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती येऊ शकते. विधानसभेचा निकाल कसा लागतो, याकडे राजभवन लक्ष ठेवून आहे.
निकालानंतर चित्र स्पष्ट होईल
याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निवडून आलेल्या सरकार पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण राज्यपाल देतात किंवा राज्यपालांकडे जाऊन बहुमत मिळवलेला पक्ष सरकार स्थापनेचा दावा करतो.
निकालानंतर आकडेवारी समोर आल्यावर कोण मुख्यमंत्री होईल किंवा युती की आघाडी जिंकेल ते स्पष्ट होईल. राज्यपाल यासंदर्भात निर्णय घेऊ शकतील. एखादी आघाडी किंवा युती नव्याने तयार होत असेल तर त्यासाठी घटनेतील शेड्युल दहानुसार निर्णय घ्यावे लागतात. गेल्या काही वर्षात काही राज्यांमध्ये कोणत्या नेत्याने मुख्यमंत्री होण्याचा दावा करायचा, याबद्दल निर्णय न झाल्याने कमी जागा जिंकलेल्या पक्षाचाही मुख्यमंत्री झाला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



