
Sangli : सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या छोट्याशा गावाने हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपली आहे. या गावात गेल्या ४४ वर्षांपासून मशिदीमध्ये गणपती बसवला जात आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जिथं मुस्लीम समाज आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवत आहे. गेल्या ४४ वर्षांपासून मुस्लीम समाज ही परंपरा जोपासत आहे.
काय घडलं होतं?
४४ वर्षांपूर्वी गोटखिंडी गावात झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील बुजुर्ग मंडळींनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. गणपतीचे पावसापासून रक्षण झाले.
पुढच्या वर्षी गावात एक बैठक घेतली गेली. या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली. त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठपणा होऊ लागली. मुस्लीम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा, अर्चना, आरती करून प्रसादाचे वाटप करतात. सर्व गावकरी यावेळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.
|
|
दंगल काळातही सलोखा अबाधित
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २००९ मध्ये गणपतीच्या काळातच मोठी हिंदू मुस्लीम दंगल झाली होती. दोन्ही समाजात त्यावेळी मोठी तेढ निर्माण झाली होती. पण, गोटखिंडी गावात अशा निकराच्या प्रसंगी सुद्धा हिंदू मुस्लीम ऐक्य अबाधित राहिलं. धार्मिक सलोखा अबाधित राहिला.
गोटखिंडीमध्ये हे दोन्ही समाज एकोप्याने, गुण्या गोविंदाने राहतात. आजच्या दूषित सामाजिक वातावरणात असे सामाजिक धार्मिक ऐक्याचे चित्र तसे दुर्मिळच आहे. गणपतीच्या काळात म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या काळात दोन तीनदा मोहरम आणि बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे सण एकत्रितपणे आले होते. तेव्हाही मुस्लिम समाजाने त्या काळात कुर्बानी न देता हा सण अनंत चतुर्दशीच्या नंतर साजरा केला होता.
याच काळात एकदा मोहरमचा सण आला होता तेव्हा त्यांनी मोहरमच्या पंजांची स्थापना आणि गणपतीची स्थापना एकाच ठिकाणी केली होती. इतका एकोपा या गावातील दोन्ही समाजाचे बांधव जपत आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे. असे उपक्रम सर्वत्र व्हायला हवेत. त्यामुळे आपण सर्व धर्मीय लोक एका समाजात गुण्यागोवंदाने राहू शकू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




