
Student Suicides Report : देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या आत्महत्या लोकसंख्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येपेक्षाही अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यातही महाराष्ट्र या नको असलेल्या संख्येत सर्वाच वरच्या स्थानी आहे. “विद्यार्थी आत्महत्या: भारतात वेगाने पसरणारी महामारी” (Student Suicides: An Epidemic Sweeping India) या शीर्षकाचा अहवाल बुधवारी वार्षिक आयसी३ परिषद आणि एक्स्पोमध्ये सादर करण्यात आला.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) च्या आकडेवारीवर आधारित या अहवालात नमूद केले आहे की, भारतात एकूण आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर चार टक्क्यांनी वाढला आहे. तसेच बऱ्याच घटनांची नोंद होत नसल्यामुळे प्रत्यक्ष आत्महत्येची संख्या यापेक्षा जास्त असू शकते, असेही या अहवालात म्हटले गेले आहे. आयसी३ संस्था ही एक बिगर सरकारी संस्था असून जगभरातील शालेय शिक्षण संस्थांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेकडून केले जाते. तसेच महाविद्यालयातील शिक्षक, समुपदेशक आणि प्रशासकांना मार्गदर्शन करण्याचेही काम संस्थेकडून केले जाते.
|
|
आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी
अहवालात २०२२ च्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे. २०२१ च्या तुलनेत (१३,०८९) २०२२ साली १३,०४४ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत अतिशय किंचितसा फरक आहे. एकूण आत्महत्येची आकडेवारी (विद्यार्थी आणि इतर घटक) यापेक्षा भयानक आहे. २०२१ साली १ लाख ६४ हजार ०३३ आत्महत्या झाल्या होत्या. तर २०२२ साली १ लाख ७० हजार ९२४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. २०२१ च्या तुलनेत आत्महत्येच्या संख्येत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागच्या दोन दशकांची तुलना केल्यास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या आहेत.
महाराष्ट्र आघाडीवर
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून एकूण आत्महत्येच्या १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर तमिळनाडू आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र – १,७६४ आत्महत्या (१४ टक्के)
तमिळनाडू – १,४१६ आत्महत्या (११ टक्के)
मध्य प्रदेश – १,३४० आत्महत्या (१० टक्के)
उत्तर प्रदेश – १,०६० आत्महत्या (८ टक्के)
झारखंड – ८२४ आत्महत्या (६ टक्के )
वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या तीनही राज्यात देशातील एक तृतीयांश आत्महत्या होत आहेत. विशेष म्हणजे राजस्थानमधील कोटा शहरात ५७१ आत्महत्यांची नोंद झाली असून ते दहाव्या क्रमाकांवर आहे. कोटा शहरात अनेक क्लासेस आहेत. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करण्यासाठी येत असतात.
मागच्या काही वर्षातील आत्महत्येचे आकडे हे लोकसंख्या वाढीच्या संख्येलाही मागे टाकत आहेत. मागच्या दशकात ०-२४ या वयोमानादरम्यानची लोकसंख्या ५८२ दशलक्षावरून घसरून ५८१ दशलक्षावर आली आहे. तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ६,६५४ वरून १३,०४४ वर पोहोचल्या आहेत.
मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या
लिंगावर आधारित आकडेवारी पाहिल्यास, मागच्या दशकात मुलांच्या आत्महत्येत ५० टक्क्यांची वाढ झाली असून मुलींच्या आत्महत्यांमध्ये ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या पाच वर्षांत विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या आत्महत्येमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



