
MP Pritam Munde : भाजप संविधान बदलणार? या विरोधकांच्या वक्तव्यावरून आता खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी एक ना अनेक प्रश्न करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपच्या मनामध्ये काही काळबेंद्र असतं, तर ते एवढ्या दिवस गप्प बसले असते का? २०१९ ते २०२४ मध्ये पार्लमेंटमध्ये भाजपची मेजॉरिटी आहे. ते काहीही करू शकले असते, अस वक्तव्या प्रीतम मुंडेंनी केलं आहे.
मात्र, ज्यांनी संविधानाचा सर्वात जास्त दुरूपयोग केला, ते काँग्रेस म्हणतंय संविधान बदलणार ? संविधानांने व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणूनच काँग्रेसकडून उचलली जीभ अन लावली टाळुला, असं करत दिशाभूल केली जाते आहे. असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या बीडमध्येमातंग समाजाच्या मेळाव्यात बोलत होत्या.
|
Weather Forecast : विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस |
यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या, की आज मलाच एक प्रश्न पडला आहे, विरोधी पक्षातील लोक म्हणतात की, जर भारतीय जनता पार्टी पुन्हा ४०० पार करत सत्तेत आली तर संविधान बदलतील. मग, संविधान बदलण्याची भीती ठराविक एकाच जातीला आणि एकाच समूहाला का दाखवली जाते, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वांना दिलं आहे, मग ते बदलल्यानंतर फक्त एकाच जातीला नुकसान कसं होईल, असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी विचारलं आहे.
मुंडे पुढे म्हणाल्या की, याचं एकच कारण आहे की. काँग्रेसची नेहमी एकच नीती राहिलेले आहे. ती म्हणजे भारतीय जनता पार्टीशी विकासावर लढता येत नाही, त्यामुळे एका जातीला एका धर्माला भीती दाखवली जातआहे. पूर्वी समान नागरी कायद्याविषयी उलट सुलट बोलल जात होतं. आरक्षण रद्द होईल, असं बोललं जात होतं. मात्र, समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. २०१४ ते २०२४ पुर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रामध्ये आहे. पहिली ५ वर्षे राज्यात देखील सरकार होतं. ४०० पार झाल्यानंतर असं काय वेगळं होणार आहे ? आजही पार्लमेंटमध्ये ३०३ खासदार हे केवळ भाजपचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



