19 मार्च 26 रोजी (या वर्षीही) मला अन्नत्याग/उपवास करणे भाग पडले आहे. कारण या वर्षीही महाराष्ट्रात दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनां आत्महत्या करणे भाग पडले आहे. त्या थांबविण्यात मी कमी पडलो. सरकारकडून शेतकरीविरोधी कायदे रद्द करून घेणे या वर्षीही जमले नाही. या आत्महत्यांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारला लाज वाटत नाही. सरकार कोडगे झाले आहे. सरकार मारेकरी असल्यामुळे त्याला शेतकरी मेल्याचे दुःख होत नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. अजुनही माझ्या संवेदना जाग्या आहेत. निरपराध माणसाची पावले मरणाकडे जाताना पाहून माझे मन कासावीस होते. मरणाकडे जाणारी पावले मला थांबावता येत नाहीत, ही जाणीव मला अस्वस्थ करते. असाह्यतेची जाणीव करून देते. या जाणीवतून मला अन्नत्याग / उपवास करावा लागतो. 19 मार्च 2017ला मी असा उपवास करण्याचे ठरवले. त्यास संतोष अरसोड सारख्या अनेक मित्रांनी पाठिंबा दिला. महागावला अनेक मान्यवर माझ्या सोबत उपोषणाला बसले होते. त्यानंतर दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग/उपवास होत आहे. लाखो लोक अन्नत्याग करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात, देशात काही प्रमाणात व अन्य देशातील किसानपुत्र काही प्रमाणात सहभागी होतात. या दिवसाला 'शेतकरी सहवेदना दिवस' असे नाव पडले. अन्नत्याग करून दिवस पालणारे हजारो कुटुंबे आहेत. या दहा वर्षात सरकारवर शेतकरी आत्महत्याचा साधा ओरखडा देखील उमटला नाही पण शेतकरी जीवनात मोठी उलथापालथ झाली आहे. मागच्या दहा वर्षाच्या काळात शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. हा एक मोठा बदल आहे. माझ्याकडे अधिकृत आकडेबारी उपलब्ध नाही पण माझा नजरी-अंदाज असा आहे की, आज 85 टक्के ग्रामीण कुटुंबात शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. शेती हे जळते घरी आहे, आपण निखाऱ्यावर चालत आयुष्य काढले असले तरी हे जळते आयुष्य लेकरांच्या वाट्याला येऊ नये याची जाणीव झाल्या बरोबर 1980 पासून शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शेतीतून बाहेर काढायला सुरुवात केली. हे शेतकऱ्यांचे उपजत शहाणपण होते. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही तर परिस्थितीने त्यांना हे शहाणपण दिले आहे. शहराच्या जवळच्या खेड्यात सक्तीच्या स्थलांतराचे प्रमाण खूप जास्त आहे. हे केवळ स्थलांतर नसून हे 'महान व्यवसायांतर' आहे. शेतीवरील अवलंबन कमी करनारी ही ऐतिहासिक घटना आहे. शेतकरी आत्महत्या कोणत्या कुटुंबात होतात? हे बारकाई ने पाहिले तर दिसून येते की 1) तो अत्यल्प भू धारक असतो 2) त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन शेती असते. शेतजमिनीच्या विखंडनाचे मुख्य कारण सीलिंग कायदा आहे. हा कायदा कायदेभंग सत्याग्रह करून मोडता येतो नाही. सरकारी कायद्यामुळे शेतीचे विखंडन शेतकरी थांबवू शकत नाही. तो कायदा सरकारच रद्द करू शकते. या ठिकाणी शेतकरी हतबल आहेत. पण 'उत्पन्नाचे एकमेव साधन शेती राहता कामा नये' यासाठी मात्र शेतकरी जीवाचा आटापिटा करू शकतात. तसा त्यांनी केला. 85 टक्के शेतकरी कुटुंबात आज शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. याचा अर्थ त्या कुटुंबातील आत्महत्या टळली आहे. आज फक्त 15 टक्केच शेतकरी कुटुंबावर आत्महत्यांची तलवार लटकती आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटली म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्या प्रमाणात घटली का?तर तसे दिसून येत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तेवढ्या प्रमाणात कमी झालेली दिसत नाही. आजच्या पेक्षा दुप्पट कुटुंबे जेंव्हा शेतीवर अवलंबून होती, तेंव्हा जेवढ्या आत्महत्या होत असत, जवळपास तेवढ्याच आत्महत्या आजही होत आहेत. याचा अर्थ, शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जास्त बिकट झाली आहे. काळोख अधिक गडद झाला आहे. वरील पार्श्वभूमीवर यंदाच्या 19 मार्चला अन्नत्याग करणे संयुक्तिक ठरते म्हणून मी हा उपवास करण्याचे ठरवले आहे. 2017ला पहिला अन्नत्याग / उपवास मी चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) येथे सुरु केला होता. या वर्षी म. फुले यांच्या भावानी पेठ, पुणे येथील वाड्यात असणार आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करून मी 19 मार्चला अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांनां श्रद्धां्धांजली अर्पण करणार आहे आणि शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतकरीविरिद्धी कायदे रद्द करण्याचा निर्धार करणार आहे. तुमचे तुम्ही ठरवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel


Join our affiliate program today and earn generous commissions!
Become our partner now and start turning referrals into revenue!
Share our products and watch your earnings grow—join our affiliate program!