औरंगाबाद : महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३९ हजार ७६० घरे उभारण्यासाठी तब्बल चार हजार ६२७ कोटी रुपयांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) राज्य शासनाला सादर केला आहे. त्यामुळे शहरातील बेघरांची अपेक्षा वाढली आहे. मात्र या घरांच्या किमती किती राहतील? कधीपर्यंत घरे मिळतील याविषयी अद्याप अनिश्चितता आहे. केंद्र व राज्य शासनाकडून दिले जाणारे सुमारे अडीच लाखापर्यंतचे अनुदान घराच्या किंमत ठरल्यानंतर त्यातून वजा होतील, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तसेच स्वतःची जागा नसलेल्या सुमारे ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. मात्र जागे अभावी आवास योजनेचे काम सुरू होऊ शकले नव्हते. खासदार इम्तियाज जलील यांनी पाठपुरावा केल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेऊन जागा देण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात डीपीआर तयार करून सात ठिकाणच्या जागेवर ३९,७६० गाळे बांधण्यासाठी चार हजार ६२७.२८ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महापालिकेने सादर केला आहे. राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे.
यासंदर्भात श्री. पांडेय यांनी सांगितले की, ३१ मार्च पूर्वी आवास योजनेचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेने जबाबदारी पूर्ण केली आहे. पुढे राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ही घरे मोफत मिळणार का? अशी विचारणा केली असता, घरांच्या किमती अद्याप ठरलेल्या नाहीत. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील कारवाई होईल, लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाचा फायदा मिळेल.
राज्यातील सर्वांत मोठी योजना
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरकारी जागेवर हा सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे. इतर महापालिकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालेले नाही. काही नगरपालिकांमध्ये सरकारी जागेवर गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. पण सुमारे ४० हजार घरांचा प्रस्ताव फक्त औरंगाबादचा आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




