
मुंबई : दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी आगीच्या ८५ दुर्घटना घडल्या असून त्यापैकी ३७ ठिकाणी फटाक्यामुळे आग लागली होती. लक्ष्मीपूजनानिमित्त सोमवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली असून या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक म्हणजे २८ ठिकाणी आग लागली. या दुर्घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरवर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या दुर्घटना घडतात. त्यामुळे अग्निशमन दलाला या काळात सतर्क राहावे लागते. गेल्या शनिवारपासून दिवाळी सुरू झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन पार पडले. बुधवारी भाऊबीज आणि पाडवा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली असून या दिवशी मोठ्या प्रमाणावर आगीच्या दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
दिवाळी सुरू झाल्यापासून तीन दिवसांमध्ये शहर आणि उपनगरात एकूण ८५ ठिकाणी आगीच्या दुर्घटनांची अग्निशमन दलाकडे नोद झाली. त्यापैकी ३७ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकूण ४१ ठिकाणी आग लागली होती. त्यापैकी २८ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याचे अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले. मध्य मुंबईतील लालबाग, परळ, दादर, तसेच वांद्रे – जोगेश्वरी पश्चिम परिसरात सर्वाधिक आगीच्या दुर्घटना घडल्या.
गेल्या दोन दिवसांत फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. फटाक्यांमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बहुतांश उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या दुर्घटना घडतात. बाण, चिडी, आकाशात फुटणारे बॉम्ब यामुळे आग लागत असल्याचे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतींच्या संकुलात, जिन्यात फटाके वाजवताना दुर्घटना घडतात, असेही ते म्हणाले. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा. इमारतीमध्ये वा जिन्यावर फटाके फोडू नयेत, फटाक्यांची वात पेटविताना थेट आगकाडी अथवा लायटरचा वापर करू नये, झाडे, विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत, खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या, दिवे लावू नयेत, विजेच्या तारा, गॅस पाइपलाइन किंवा वाहनतळांच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत, असे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




