
पुणे : राज्यात पावसाळी स्थितीमुळे नागरिकांना हैराण केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून यात वातावरणामुळे हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश वेळेला ‘वाईट’ या गटात असलेली मुंबई आणि पुण्याची हवा आठवडय़ापासून ‘उत्तम’ गटात मोडते आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या आणि नेहमीच हवा धोकादायक गटात असलेल्या दिल्लीतही सध्या काही प्रमाणात काही होईना शुद्ध आणि समाधानकारक हवा मिळत आहे.
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’च्या वतीने घेण्यात येत असलेल्या नोंदींवरून ही बाब स्पष्ट होत आहे. सफर संस्थेच्या वतीने शहराच्या विविध भागांतील आणि प्रामुख्याने मोठी रहदारी असलेल्या ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी दररोज घेतल्या जातात. पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टीक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण सातत्याने तपासले जाते. त्यानुसार १०० पर्यंतची अतिसूक्ष्म कणांची पातळी उत्तम समजली जाते. त्यानंतर १०० ते २०० समाधानकारक, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अत्यंत वाईट, तर ४०० ते ५०० या प्रमाणात अतिसूक्ष्म कणांची हवेतील पातळी ही अतिधोकादायक समजली जाते. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांत राज्यातील प्रमुख शहरांतील हवा उत्तम गटात आहे. पावसाळी वातावरणामध्ये हवेत पसरणारे धुळीच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण आपोआपच कमी होते. त्यातून हवेती गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असते. त्यानुसार मुंबई, पुण्यासह विविध शहरांत हवेतील प्रदूषित कणांचे प्रमाण कमी झाले आहे.
मुंबई शहरातील हवेची सरासरी गुणवत्ता गुरुवारी (१३ ऑक्टोबर) उत्तम स्थितीत (६२) होती. मुंबईपेक्षा पुण्याची स्थिती चांगली असून, हवेतील अतिसूक्ष्म कणांची पातळी केवळ ४७ म्हणजेच उत्तम स्थितीतच होती. या दोन्ही शहरातील ही पातळी अनेकदा दोनशेच्याही वर असते. हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण नेहमीच वाईट आणि अनेकदा अतिधोकादायक पातळीवर असणाऱ्या दिल्लीमध्येही गेल्या काही दिवसांत हवा उत्तम असून, गुरुवारी प्रदूषणकारी कणांची हवेतील पातळी दिल्लीत ११९ म्हणजे समाधानकारक गटात होती.
मुंबईतील सरासरी हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असली, तरी बीकेसी आणि नवी मुंबई भागांत हवेतील अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण किंचित जास्त आहे. अशीच स्थिती पुण्यात शिवाजीनगर आणि कोथरूड भागांत दिसून येते. दिल्लीतील मथुरा रस्ता, नोयडा आणि दिल्ली विद्यापीठ परिसरातही हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण काहीसे अधिक आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




