
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अकरावी प्रवेशासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली जाणार असून, ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि तीन विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र अद्यापही १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळलेला नाही. त्यातील ११ हजार ४६२ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले नाही, तर १ हजार २२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. तसेच या पूर्वी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महाविद्यालयाला प्रवेश ॲलॉट केला जातो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार अर्ज केल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल. त्या दिवसात प्रवेश न घेतल्यास त्या दिवसासाठी दिलेली पसंती रद्द समजून पुढील दिवसासाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज करता येईल. या फेरीमध्ये विद्यार्थ्याने पसंती दर्शवलेल्या प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रतीक्षा यादीत त्याचे स्थान पाहता येईल. कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त जागांनुसार तितके विद्यार्थी त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या निवड यादीत समाविष्ट होतील. उर्वरित विद्यार्थी प्रतीक्षा यादीत राहतील. निवड यादीत असलेल्या विद्यार्थ्याला कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला पसंती देऊन प्रवेशासाठी जाता येईल. या पद्धतीने ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून तीन महिने होऊन गेले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करताना ही फेरी शेवटची असल्याचे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवली जाणार नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले होते. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली जात असल्याचे दिसून येत आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




