
इतिहासकाळात जितकी महत्त्वाची होती तितकीच आजही महत्त्वाची असलेली ठाणे शहरातील वास्तू कोणती? ती वास्तू आहे ठाणे कारागृह सन १७३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केलेली असतानाच सन १७३७ च्या मार्च महिन्यात मराठी सैन्याने ठाणे जिंकून घेतले. किल्ल्याचे अपुरे राहिलेले काम मराठ्यांनी पूर्ण केले आणि ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर पाच भक्कम बुरुजांचा किल्ला उभा राहिला. सन १७७४ च्या डिसेंबरमध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून ठाणे जिंकून घेतले. तेव्हाच्या नोंदीनुसार या पंचकोनी किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी भक्कम असून त्यावर शंभरपेक्षा जास्त तोफा असल्याची माहिती मिळते. सन १८१६ मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना याच किल्ल्यात बंदिवान ठेवण्यात आले. ते बहुदा या किल्ल्यातील पहिले कैदी म्हणता येतील. मात्र त्यांनी अतिशय हुशारीने या कैदेतून पळ काढला. त्यामुळे या किल्ल्यातील कारागृहातून पळणारे पहिले कैदी म्हणूनही डेंगळे यांचे नाव घ्यावे लागते.
ब्रिटिशांनी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून सन १८३३ मध्ये याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले. सन १८४४ मध्ये जिल्हा न्यायाधीश तुरुंगाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना, कैद्यांनी त्यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी ठरला. सन १८७६ मध्ये ४ लाख ८ हजार रुपये खर्च करून तुरुंगाचा कायापालट करण्यात आला. किल्ल्याच्या पश्चिम द्वाराजवळ अधीक्षकाचे निवासस्थान तयार करण्यात आले. किल्ल्यात स्वतंत्रपणे महिला बराक, रुग्णालय तयार करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे राघोजीराव भांगरे यांना याच कारागृहात २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आले. नोव्हेंबर १८७९ ते जून १८८० या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. १९०९ मध्ये गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश न्यायालयाने काळ्या पाण्याची (अंदमान) शिक्षा ठोठावली. अंदमानला पाठवण्याआधी बाबारावांना ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. बाबारावांवरील अन्यायाचा निषेध म्हणून अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायक देशपांडे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या तिघांना ११ एप्रिल १९१० रोजी ठाण्याच्याच तुरुंगात फाशी देण्यात आली. ठाण्याच्या तुरुंगात या हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुढे स्वातंत्र्य आंदोलन ऐन भरात आले तेव्हा ठाण्याचे किल्ला कारागृह राजबंद्यांनी खच्चून भरले. त्यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी ठाण्यात 'राजबंदी सेवा समिती' स्थापन करण्यात आली. या काळात बाळासाहेब खेर, एस. एम. जोशी, केशव गोरे, माधव लिमये, द. म. सुतार, नाथा ताम्हाणे यांनी या तुरुंगात कारावास भोगला. १९४२च्या चळवळीत महिलांच्या बराकीत जागा नसतानाही महिलांना डांबण्यात आले, तेव्हा ३० महिलांनी बैठा सत्याग्रह करून तुरुंग प्रशासनाला नमवले होते. स्वातंत्र्यानंतरही आणीबाणीविरोधी आंदोलनात ठाणे कारागृहात राजबंद्यांना ठेवण्यात आले होते. संजय दत्त, हर्षद मेहता असे कैदीही या कारागृहाने पाहिले आहेत. मुळातला ठाण्याचा संरक्षक किल्ला जो स्वातंत्रसैनिकांच्या वास्तव्याने पावन झाला तो आज मात्र दरोडेखोर, खुनी आणि इतर गुन्हेगारांची बंदिशाळा बनला आहे. तिथे ठाण्याच्या स्वातंत्र्य चळवळीची स्मृती जागवणारे संग्रहालय व्हायला हवे, अशी अपेक्षा ठाणेकरांकडून व्यक्त केली जाते.
कसे जाल?
सर्वसामान्य नागरिकांना ठाण्याच्या पश्चिम भागातील हे कारागृह आतून बघता येत नाही. कोर्ट नाक्यावरून कळव्याकडे जाताना ठाणे कारागृहाचे प्रवेशद्वार दिसते. त्याची भक्कम तटबंदी आजही तो किल्ला असल्याची साक्ष देते.
शहर
- महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ! मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय आणि ३ शहरांचे महापौर टार्गेटवर; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!
- पुण्यात पुन्हा गोळीबार! सहकारनगरमध्ये जिम मालक योगेश बनेकरवर ४ जणांचा जीवघेणा हल्ला; २ गोळ्या लागल्या, पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना बेड्या ठोकल्या!
- बळिराजाची चिंता वाढली! अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, IMD चा नवा अंदाज!
- शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.
महाराष्ट्र
- महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ! मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय आणि ३ शहरांचे महापौर टार्गेटवर; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!
- पुण्यात पुन्हा गोळीबार! सहकारनगरमध्ये जिम मालक योगेश बनेकरवर ४ जणांचा जीवघेणा हल्ला; २ गोळ्या लागल्या, पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना बेड्या ठोकल्या!
- बळिराजाची चिंता वाढली! अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, IMD चा नवा अंदाज!
- शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel



